Agrowon - Agriculture News

राज्यातील अनेक भागांत पावसाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या मॉन्सूनकडे लागल्या आहेत. रब्बी हंगामासाठी परतीचा पाऊस किती महत्त्वाचा आहे, २५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील पावसाची स्थिती कशी राहू शकते आणि पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता किती आहे, याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
रानडुकरांमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. रानडुकरांना इजा न करता किंवा हानी न पोहोचवता त्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी सोपे घरगुती आणि पर्यावरणपूरक उपाय कोणते, याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली आहे. दुष्काळाची परिस्थिती, आर्थिक मदत, वीज पुरवठा आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीसह काजू-बदाम प्रकरणावरील त्यांच्या भूमिकेचा आढावा या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.
सोयाबीनच्या बाजारभावात घसरण झाली असून ओल्या भुईमुगाचे दर टिकून आहेत. भेंडीच्या भावात बदल, काकडीच्या दरात चढ-उतार आणि केळीच्या बाजारात नरमाई पाहायला मिळत आहे; राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.
मॉन्सूनने १९ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू केला असून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार घेतली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राजस्थान, पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छच्या काही भागांतून मॉन्सूनच्या माघारीसाठी अनुकूल स्थिती असून राज्यातील पुढील ५ दिवसांच्या पावसाच्या अंदाजाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
जनावरांना ओला आणि वाळलेला चारा योग्य प्रमाणात देणे आवश्यक असून कमी पावसाच्या परिस्थितीत चाऱ्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. वाळलेल्या चाऱ्याची साठवण, योग्य चारा पिकांची निवड, साठवणीचा कालावधी आणि वाळलेल्या चाऱ्याला अधिक पौष्टिक करण्याच्या प्रक्रियेची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
देशातील बहुतांश भागांत पावसाची तूट आणि पावसाचे दीर्घ खंड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा खरीप पिकांवर होणारा परिणाम, परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आणि आगामी रब्बी हंगामाविषयी वाढलेली चिंता याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
जागतिक बाजारपेठेत म्हशीच्या मांसाची मागणी वाढल्यामुळे भारताच्या पशुधन उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होत आहे. म्हशीच्या मांसाला कोणत्या देशांमध्ये मागणी वाढली, मांसासह दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांचा निर्यातीत वाटा आणि या वाढीचा पशुपालक व शेतकऱ्यांना होणारा संभाव्य फायदा याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
Maharashtra crop market price update
Daily market rates for jowar urad and vegetables
Maharashtra agricultural market rates today
Today's fruit and vegetable market rates in Maharashtra
Vegetable and fruit market prices Maharashtra
Daily vegetable market rates in Maharashtra Market
Daily agricultural market rates Maharashtra
Maharashtra farmers market rates today
Solapur Land Survey
Government Funds
Crop Insurance
Delhi Farmers Meeting
Rabi Crop Seminar
Chimur Farmers Protest
Sangli Bank Election
Urad Harvesting
Livestock Care During Rain Break
Dry fodder management during El Nino
Pearl Millet For Fodder Production,
Sugarcane Transport Essential Care Tips For Bullocks
Make Quality Silage For Livestock
Silage Making For Dairy Animals
Bullock Care During Pola Festival
Private Veterinary Colleges
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com