Animal  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांतील बुरशीजन्य विषबाधा

Team Agrowon

डॉ. बाबासाहेब घुमरे, डॉ. विकास कारंडे

Animal Health : काही बुरशींपासून दुय्यम पदार्थ तयार होतात. त्यापासून जनावरांना विषबाधा होत असते. अशा प्रकारची विषबाधा जास्त प्रमाणात झाल्यास काही जनावरांचा मृत्यू देखील होतो. बुरशीजन्य विषबाधेचा प्रसार हा संसर्गजन्य आजारासारखा एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरास होत नाही.

विशिष्ट ऋतूमध्येच बुरशीजन्य विषबाधा दिसते. बऱ्याच बुरशी जनावरांची प्रतिकार शक्ती कमी करतात. त्यामुळे अशी जनावरे जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांना बळी पडतात. बुरशीजन्य विषबाधेवर प्रतिजैविकांचा परिणाम होत नाही. काही बुरशीची वाढ विशिष्ट पशुखाद्यामध्ये होते.

अफ्लाटॉक्सीनमुळे होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण अधिक आहे. हा पदार्थ अस्परागस फ्लावस आणि अस्परागस परासायटीकास बुरशीपासून तयार होतो. ही बुरशीजन्य विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते.

अफ्लाटॉक्सीनचे प्रमाण साठवलेले धन्य जसे की, गहू, ज्वारी, तांदूळ, सोयाबीन, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि इतर सर्व पेंडीमध्ये अधिक प्रमाण तयार होते.

जेव्हा वातावरणातील आर्द्रता १५ टक्के आणि तापमान २५ ते ३२ अंश सेल्सिअस असते, तेव्हा धान्यामध्ये तयार झालेले अफ्लाटॉक्सीन बरीच वर्ष टिकते. या बुरशीचा संपर्क पीक

शेतात असताना, धान्य मळणी करताना किंवा अयोग्य साठवण केल्यास होते.

विषबधेची लक्षणे

तीव्र प्रकार

जनावरांनी अफ्लाटॉक्सीनयुक्त धान्य किंवा पशुखाद्य अधिक प्रमाणात खाल्लेले असते. या प्रकारची विषबाधा अनेक जनावरांना होते.

काही जनावरांचा मृत्यू तत्काळ होतो.

लक्षणे

जनावरे अशक्त बनतात. चारा पाणी खात नाहीत. सुस्त बनतात.

काही जनावरांच्या तोंड, नाक आणि शेणातून रक्त पडते. जनावरांना संडास लागते.

मध्यम प्रकार

विषबाधा जनावरांनी अफ्लाटॉक्सीन कमी प्रमाण पशुखाद्यातून तीन महिन्यापर्यंत खाल्ल्यास होते.

लक्षणे

जनावरांना कावीळ होते. जनावरे दात खातात, झटके येतात.

जनावरांच्या अंगाला खाज सुटते. शरीरांतर्गत रक्तस्राव होतो.

कमी प्रकार

विषबाधा जनावरांनी अफ्लाटॉक्सीन कमी प्रमाण पशुखाद्यातून सहा महिन्यांपर्यंत खाल्ल्यास होते.

लक्षणे

विषबाधा जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसते. जनावरांची पचन शक्ती, क्रय शक्ती कमी होते.

तब्येत कमी कमी होत जाते. दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते.

गाभण जनावरांचा गर्भपात होतो.

कोंबड्यामध्ये अंडी उत्पादन तसेच मांस उत्पादन कमी होते.

प्रतिकार शक्ती कमी खूप कमी

होते त्यामुळे जनावरे जिवाणू व विषाणूजन्य आजारांना बळी पडतात.

वेळेत उपचार न भेटल्यास जनावरांचा मृत्यू होतो.

प्रतिबंधक उपयोजना

विषबाधेवर खात्रीशीर उपचार उपलब्ध नसल्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा ठरतो.

बुरशीयुक्त चारा, पशुखाद्य जनावरांना खाऊ घालणे बंद करावे.

काही शेतकरी कमी खर्चात पशुखाद्य बनविण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करतात. ते धान्य बुरशीयुक्त नाही याची खात्री करून वापरावे.

बुरशीयुक्त चारा कापणी करताना वेगळा करून ठेवावा, तो चांगल्या चाऱ्यासोबत मिसळू नये.

पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये.

बुरशीयुक्त धान्याचा भरडा किंवा मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.

विषबाधित जनावरांना जादा प्रथिनयुक्त पशुखाद्य, जीवनसत्त्व ई, सेलेनीयमचा पुरवठा करावा.

विषबाधित जनावरांना दुय्यम प्रकारचा आजार झाला असल्यास पशुतज्ज्ञांकडून योग्य उपचार करावा.

डॉ. बाबासाहेब घुमरे, ७७०९५११७४१

डॉ. विकास कारंडे, ९४२००८०३२३

(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT