Jayakwadi Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून ३१४४ क्युसेकने विसर्ग

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून सोमवारी (ता. ९) दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान सहा दरवाज्यांतून ३,१४४ क्युसेकने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

त्यासाठी सहाही दरवाजे ०.५ फूट उघडण्यात आले असल्याची माहिती जायकवाडी धरण (नाथसागर) नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

सोमवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) ९७.३० टक्के क्षमतेने भरला आहे. १०२.७३ टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पात ७४.५९ टीएमसी जिवंत तर १००.६५ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे.

सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास १५,१४४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. पाण्याची आवक बघता दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान गोदावरी नदी पात्रात ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय उजव्या कालव्यातून ५०० क्युसेकने माजलगाव प्रकल्पासाठी विसर्ग सुरू होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ४ लाख ५४ हजारांवर पूर्वसूचना

Crop Insurance : पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के अग्रिम रक्कम

Forest Right Act : वन दाव्याच्या हक्कासाठी मोर्चा

Farmer Incentive Scheme : आधार प्रमाणीकरणासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत

Women Entrepreneur : महिला उद्योजकांचे ‘आई’कडे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT