Jayakwadi Dam : गोदापात्रावरील गावांना खबरदारीच्या सूचना, जायकवाडीतून ३ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग; इतर दोन धरणातूनही पाणी सोडले

Koyna And Radhanagari Dam : साताऱ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर सरी कोसळल्या. यामुळे कोयनेसह राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यादरम्यान जायकवाडी धरणदेखील भरल्याने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on

Pune News : मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण ९७.३० टक्के भरले. त्यामुळे आता धरणातून गोदापात्रात सोमवारी ( ता.९) दुपारी ३ हजारहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे धरणाखालील गावांना खबरदारीच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे धरण म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिले जाते. मागील महिन्यात धरण भरेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण ९७.३० टक्के भरले आहे.

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : मृत साठ्यात गेलेले जायकवाडी धरण भरले तुडूंब, ६ दरवाजे उघडले

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी जायकवाडी धरणात ३२.५५ टक्के पाणीसाठा होता. आता धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणातून सध्या गोदावरी नदीत ३ हजार १४४ क्यूसेकने विसर्ग केला जात असून धरणात पाण्याची होणारी आवक लक्षात घेवून विसर्ग कमी अथवा जास्त केला जाईल, अशी माहिती धरण कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

सध्या धरणाचे ६ दरवाजे ०.५ फुटाने उचलण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. तसेच कोणतीही जिवीत वा वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील कार्यकारी अभियंता जाधव यांनी केले आहे.

Jayakwadi Dam
Radhanagari Dam : राधानगरीचे चार दरवाजे उघडले

धरण ९७.३० टक्के भरले

यंदा जायकवाडी धरण मृत साठ्यात गेले होते.‌ पावसाळा सुरु झाल्यानंतर सुरवातीच्या जुन, जुलै या दोन महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरण कोरडेच होते. पण आगस्ट महिन्यात नासिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याची आवक थेट जायकवाडी धरणात झाली. यामुळे कोरडे पडलेले धरणात पाणी पातळी वाढली. आता धरण ९७.३० टक्के भरल्याने गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे.

कोयनेतून ९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

दरम्यान, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात रविवारी (ता.८) पावसाने हजेरी लावली. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गात घट करण्यात आली आहे. सध्या धरणातून ९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात ९९.५१ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २८२१.६७ दश लक्ष घन मीटर (द.ल.घ.मी) आहे.

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात रविवारी जोरदार सरी कोसळल्याने धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. दरवाजा क्र. ५ आणि ६ उघडल्याने २८५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. तर विज निर्मिती केंद्रातून देखील १५०० क्युसेकची विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com