Vegetable Farming Agrowon
यशोगाथा

Vegetable Farming: पालेभाज्यांमधून मिळविले बारमाही उत्पन्न

Success Story: सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावातील शेतकरी खारट पाण्याच्या समस्येशी सामना करून विविध हंगामांत बारमाही पालेभाजी शेती करतात. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी कमी जमिनीत सातत्याने उत्पन्न मिळवण्याचा यशस्वी मार्ग शोधला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

अभिजित डाके

Indian Agriculture: कवलापूर (जि. सांगली) गाव पालेभाज्यांच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात खाऱ्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे नगदी पिकांच्या काही मर्यादा आहेत. तरीही बाजारपेठांचा अभ्यास, विविध हंगामांतील मागणी लक्षात घेऊन वर्षभर टप्प्याटप्प्याने थोड्या- थोड्या गुंठ्यात विविध पालेभाज्या पिकविण्याचे कसब त्यांनी मिळवले आहे. त्यातून बारमाही ताज्या उत्पन्नाचा हुकमी स्रोतही निर्माण केला आहे.

‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी’ या संत सावंता माळी यांच्या अभंगातील ओळी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करून जातात. सांगली जिल्ह्यातील कवलापूर हे सांगली शहरापासून अवघ्या दहा ते अकरा किलोमीटरवर वसलेले गाव आहे. पूर्वी गावात गुलाबाची शेती केली जायची.

परंतु समस्यांमुळे गुलाबाचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांनी थांबवले. मग गाजराची शेती सुरू झाली. आजही हे गाव गाजर उत्पादन आणि बियाणे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ऊस, द्राक्षे ही देखील कवलापूर गावची ओळख आहे. मात्र अशी नगदी, व्यावसायिक पिके घेण्यासाठी मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या शब्दांत सांगायचे तर येथील जखीणमळ्यात पाणी सवळ म्हणजे क्षारयुक्त आहे. त्यामुळे पिकांचे प्रयोग करण्याला मर्यादा आहेत. या पाण्यात पालेभाज्या मात्र चांगल्या प्रकारे येऊ शकतात असा इथल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

...अशी होते पालेभाज्यांची शेती

गावातील जखीणमळा येथील प्रत्येक कुटुंब पालेभाज्या उत्पादनात अग्रेसर आहे. मागील काही पिढ्यांपासून त्यांनी त्यात सातत्य, चिकाटी कायम ठेवली आहे. त्यामुळे या पिकांमध्ये चांगला अभ्यास होऊन त्यात ते माहीर झाले आहेत. नैसर्गिक संकटांमध्येही त्यांची लागवड थांबत नाही. प्रत्येक कुटुंबाचे १० गुंठ्यांपासून ते अर्धा एकरांपर्यंत पालेभाजीचे क्षेत्र असते. पालेभाज्यांचा कालावधी तुलनेने तसा कमी असतो.

परंतु कष्ट खूप करावे लागतात. काढणी व विक्री वेळेत करावी लागते. तरच चांगला दर मिळतो. कापणी, पेंढ्या बांधणीपर्यंत मजुरांची आवश्यकता असते. सध्याची मजूरटंचाईची समस्या लक्षात घेता घरातील सर्व सदस्य शेतीत राबतात. कामे वेळेत करण्याची जबाबदारी चोख पार पाडतात. त्यातून मजुरी खर्चात बचतही करतात. गावातील विष्णू माळी, अरुण माळी, सुधीर माळी सांगतात, की बाजारपेठेतील आवकेवर दर ठरतात.

प्रत्येक शेतकरी एकाच बाजारात न जाता विविध बाजारात गेल्याने तिथली आवक व दरांची परिस्थिती लक्षात येते. त्यानुसार आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. त्यानुसार काढणी व बाजारात माल पाठवण्याचे नियोजन होते. त्यातून अपेक्षित दर मिळण्यास मदत होते. यंदा मेपासून पावसाला सुरवात झाली. त्यामुळे ऐन हंगामात भाज्यांचे नुकसान झाले. पुढील लागवडीसाठीही अडथळे निर्माण झाले. परंतु अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी धाडसाने लागवडीचे नियोजन केले.

विक्री व्यवस्था

गरजेनुसार पन्नास पेंढ्यांचा गठ्ठा तयार केला जातो.

सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, इस्लामपूर आदी बाजारपेठांमध्ये विक्री.

स्थानिक किरकोळ तसेच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडूनही खरेदी.

उन्हाळ्यात दररोज तांबडा, हिरवा माठ यांची सहा- सात हजारांपर्यंत तर पालक, चाकवतीच्या दोन हजार पेंड्यांची विक्री.

मशागतीपासून ते काढणीपर्यंत सुमारे १० हजार रुपये खर्च.

तांबडा, हिरवा माठास सरासरी दर- ४०० ते ५०० रुपये प्रति शेकडा.

पालक, चाकवत- ७०० ते ८०० रुपये प्रति शेकडा.

शेतकरी अनुभव

कवलापूरचे गणेश महादेव माळी यांची पाच एकर शेती आहे. पैकी दोन एकर पालेभाज्या व उर्वरित ऊस असतो. पालेभाज्यांमध्ये तांदुळजा, लाल- हिरवा माठ, चाकवत, पालक अशी विविधता असते. लाल माठ हे उन्हाळ्यातील पीक आहे. तीन- चार महिने ते चालते. त्याची दर १५ दिवसांच्या अंतराने कापणी येते. प्रति कापणीत १० गुंठ्यांत २५०० ते ३००० पेंढ्या मिळतात. सांगली. इचलकरंजी बाजारपेठेत विक्री होते. सरासरी ४ ते ५ रुपये प्रति पेंढी त्यास वर्षभर दर मिळतो. काही वेळा हा दर एक ते तीन रुपयांपर्यंतही खाली येतो. चाकवत, पालक ही सुमारे दीड महिन्याची पिके आहेत. ती पावसाळ्यापासून पुढे टप्प्याटप्प्याने ठरावीक अंतराने घेण्यात येतात. प्रति पेंढी ७ ते ८ रुपये त्यास दर मिळतो. वर्षाला दोन लाखांपर्यंत उत्पन्न पालेभाज्या देऊन जातात. गणेश म्हणतात, की आमच्या भागात खारे पाणी असल्याने पालेभाजी पीकपद्धती येथे अनुकूल ठरते. ही ताजे उत्पन्न देणारी पिके आहेत. यातील जोखीम म्हणजे नाशिवंत माल असल्याने लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे नियोजन काटेकोरच करावे लागते.
गणेश माळी ९९७५३४५५३३
अमर नामदेव माळी यांची आठ एकर शेती आहे. त्यात ऊस, गाजर या पिकांव्यतिरिक्त पालेभाज्यांसाठी अर्धा ते एक एकर क्षेत्र राखीव ठेवले जाते. ते सांगतात, की आमची तिसरी पिढी भाजीपाला उत्पादनात आहे. तांबडा- हिरवा माठ, पालक, चाकवत आदी पिके घेतो. अन्य पिकांच्या खर्चाला त्यातून हातभार लागतो. बहुतांश पालेभाज्या सव्वा ते दीड महिन्यात येतात. साधारण १५ दिवसांचे अंतर ठेवून लगेच पुढील लागवडीची तयारी सुरू होते. वर्षातून अशा प्रकारे किमान सहा ते सात वेळा उत्पादन घेतले जाते. गावातील विकास विठ्ठल माळी सांगतात, की दररोज पैसा हाती येत असल्याने घरखर्चासाठी पैसे उपलब्ध होतात. तर कधी नगदी पिकांसाठी देखील पैशांचा हातभार लागतो. वातावरणाची साथ मिळणे मात्र गरजेचे असते.
अमर माळी ९०९६७५२५२६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT