Market Bulletin  Agrowon
बाजार विश्लेषण

Agrowon Podcast : मक्याचा बाजार पुढील काळात कसा राहू शकतो?

Market Bulletin : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भाव कमी जास्त होत आहेत. तर काही मालांचे भाव स्थिर आहेत.

Anil Jadhao 

Marketing intelligence : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.५० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४२७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनमध्ये क्विंटलमाग ५० ते १०० रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक स्थिर दिसते. तर अनेक शेतकरी आता भाववाढीच्या प्रतिक्षेत असल्याचे व्यापारी सांगतात. तर सोयाबीनचा भाव या पातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतो, असेही अभ्यासकांनी सांगितले.

देशातील बाजारात कापसाच्या भावात काहिसे चढ उतार सुरु आहेत. व्याद्यांमध्ये भाव स्थिर दिसत नाही. आता नुकत्याच पडलेल्या पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान केले. यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका आहे. परिणामी गुणवत्तापूर्ण मालाला उठाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाची आवक मागील पाच दिवसांमध्ये पावसामुळे कमी झाली होती. तर आता शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस मागे ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याचे भाव मागील आठवडाभरापासून स्थिर दिसतात. यंदा खरिपातील मका उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे मक्याच्या भावात मागील महिनाभरात क्विंटलमागं ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली. मक्याचा बाजारभाव सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांवर पोचला. मक्याची बाजारातील आवक कमी असली तरी मागणी पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे दरात अपेक्षित वाढ नाही. पण रब्बीतील मका पिकाला दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेचा फटका बसू शकतो. म्हणजेच उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे मका बाजाराला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याच्या भावातील नरमाई कायम आहे. आल्याची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता. तसेच नवा माल बाजारात पुढील एक ते दीड महिन्यात सुरु होईल. त्यामुळे आल्याचे भाव आता ७ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आले. यंदाही आले उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पण नवा माल बाजारात येणार यामुळे दरात नरमाई दिसून आली. पण बाजारातील नव्या मालाची आवक एखदा येऊन गेल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारात हिरव्या मिरचीच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचे दिसते. बाजारातील आवक स्थिर आहे. काही बाजारात आवक वाढल्याने दरात नरमाई देखील दिसून आली. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पावसाने मिरची पिकाला मोठा तडाखा दिला. अनेक भागात पीक आडवे झाले. त्यामुळे हा माल बाजारात येत आहे. पण पुढील काळात पिकसाठी पुरेशे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT