Satara News: आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून दरात सुधारणा सुरू आहे. सध्या प्रति गाडीस (५०० किलो) १० ते ११ हजार रुपये दर मिळाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत तीन ते चार हजार रुपये दरात वाढ झाली आहे. पावसामुळे आले पीक काढता येत नसल्याने तुटवडा भासत असल्याने दरात सुधारणा झाल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
आले पिकाचे बियाणे खरेदीच्या वेळी मार्च महिन्यात गाडीला १० ते १२ हजार रुपये दर मिळत होते. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून आले पिकाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट होत गेली आहे. आले ११ ते १२ हजार रुपयांवरून अगदी सहा ते सात हजार रुपयांवर दर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आले काढून विक्री केली होती.
दर कमी असल्याने व्यापाऱ्यांकडून आले सौदे करण्याचे प्रमाण कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी मजुरांकरवी आले काढून, धुऊन बाजारपेठेत विक्री केली होती. सलग तीन महिने दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यापासून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली होती.
मागील तीन महिन्यांच्या तुलनेत आल्याचे तीन ते चार हजार रुपयांनी सुधारणा झाली आहे. या सुधारणेमुळे पुन्हा एकदा आले पिकाच्या सौद्यास वेग येऊ लागला आहे. सध्या खरेदी करण्यात नवा जुना माल व्यापाऱ्यांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.
मात्र खरेदी न होण्याची भीतीने शेतकऱ्यांकडून व्यवहार गोपनीय पद्धतीने केले जात असल्याचे बोलले आहे. पावसामुळे पीक काढता येत नसल्याने बाजारात आवक कमी होत आहे. परिणामी, दरात सुधारणा होत असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.