Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात गिरणा पट्ट्यात भूजलपातळी दिवसागणिक खालावत आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकांची जलपातळी कमालीची घटली असून, केळी व अन्य पिके कशी वाचवावीत, असा प्रश्‍न आहे.

गिरणा पट्ट्यात दुष्काळी स्थिती आहे. गिरणा नदीत दोन वेळेस टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन सोडले आहे. परंतु नदीकाठीदेखील टंचाई आहे. तसेच नदीकाठच्या शिवारातही अपवाद वगळता मुबलक जलसाठे नाहीत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण नदीतून वाळूउपसा सुरू आहे. वाळू नसल्याने पाणी मुरत नाही व विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नाही. यामुळे शेतकरी नव्याने पीक लागवड करू शकत नसल्याची स्थिती आहे.

गिरणा पट्ट्यातील सर्वच प्रकल्प कोरडे आहेत. गिरणा धरणातील जलसाठा २९ टक्क्यांखाली आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. परंतु त्यात आता जलसाठा कमालीचा कमी झाला आहे. अन्य लहान - मोठे तलावही आटले आहेत. यामुळे बागायती शेती धोक्यात आली आहे. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव हा भाग केळी, लिंबू व अन्य पिकांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु लिंबू, केळी ही पिके वाचविताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

केळी पीक कमी पाण्यात तग धरत नाही. लहान केळीस रोज किमान पाच तास पाणी हवे आहे. तर मोठ्या केळीस रोज सात ते आठ तास पाणी हवे आहे. पण जलसाठे कमी असल्याने एवढा कालावधी कुणी शेतकरी केळी पिकाचे सिंचन करू शकत नाहीत. पाचोऱ्यातील नगरदेवळा व अन्य भागातील केळी पिकास उष्णतेसह कमी पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

सध्या ऊन वाढत आहे. असात केळी पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रंदिवस धडपड सुरू आहे. अनेकांनी ज्वारी, बाजरी, मका, गहू आदी पिकांची पेरणी केली होती. परंतु फेब्रुवारीतच जलपातळी कमी झाली. विहिरी, कूपनलिका आटू लागल्या. यामुळे रब्बीतील पिकांचेही व्यवस्थितपणे सिंचन करता आले नाही. यात अनेकांना आपली उभी पिके सोडून द्यावी लागली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT