Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Water Crisis : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात किंवा उत्तर-पूर्व भागात टंचाई कमी आहे. परंतु गिरणा पट्टा कोरडा झाला असून, शिवार उजाड होत आहेत. अनेक प्रकल्पांनी तळ गाठला असून, टंचाई वाढत आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात किंवा उत्तर-पूर्व भागात टंचाई कमी आहे. परंतु गिरणा पट्टा कोरडा झाला असून, शिवार उजाड होत आहेत. अनेक प्रकल्पांनी तळ गाठला असून, टंचाई वाढत आहे.

उत्तर-पूर्व भागातील रावेर, यावल, चोपडा या भागात टंचाई कमी आहे. कारण सातपुड्यातील व लगतचे सर्वच प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यात रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील गारबर्डी, मोर, निंबादेवी, चोपड्यातील गूळ व अनेर हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. तसेच तापी नदीवरील भुसावळनजीकचा हतनूर, जामनेरातील वाघूर व तोंडापूर या प्रकल्पांतही १०० टक्के जलसाठा होता. या भागात आजघडीला टंचाई कमी आहे. फक्त सातपुडा पर्वतातील काही भागात कृत्रीम टंचाई आहे.

Water Shortage
Water Crisis : राज्यातील धरणांतील पाणीसाठा आला २७ टक्कांवर; टँकर सख्येतही झपाट्याने वाढ

परंतु जिल्ह्यातील पश्चिम व अन्य भागात टंचाई दिवसागणिक वाढत आहे. कारण या भागातील कमाल प्रकल्प, तलाव कोरडे झाले आहेत. त्यात चाळीसगावातील मन्याड, पाचोरा व पारोळालगतचा भोकरबारी या प्रकल्पांत ठणठणाट आहे. गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील नांदगावात असलेल्या गिरणा धरणात यंदा फक्त ५६ टक्के जलसाठा होता. पाऊसमान जून व ऑगस्टमध्ये कमी होते.

Water Shortage
Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

नंतर पाऊस झाला, परंतु त्यामुळे धरणातील जलसाठा फारसा वाढला नाही. गिरणा धरणावर जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांच्या रब्बी हंगामाची भिस्त आहे. परंतु या धरणात जलसाठा हवा तसा नसल्याने रब्बीसाठी त्यातून एकही आवर्तन मिळाले नाही. तब्बल २१ हजार हेक्टर क्षेत्र यामुळे तहानले. यातच टंचाईदेखील वाढली आहे. पश्चिम भागातील बहुळा, अग्नावती, अंजनी, बोरी, या प्रकल्पांतील जलसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. कारण खानदेशात उष्णता वाढली आहे. कमाल तापमान २३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

गिरणा धरणातून टंचाई निवारणार्थ दोन वेळेस नदीत पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी जळगाव तालुक्यातील कानळदा गावापर्यंत सोडण्यात आले होते. १०० गावांमधील टंचाई याने दूर होण्यास मदत होते. परंतु नदीतून वाळूउपसा वेगात सुरू आहे. यामुळे नदीकाठीदेखील टंचाई आहे. शिवारात जलसाठे कमी होत आहेत.

कापूस, भाजीपाला पिकांना फटका

गिरणा पट्ट्यात कापूस लागवडीला यंदा जलसाठे कमी असल्याने काहीसा ब्रेक येईल. जूनमध्ये या भागात दरवर्षी कापसाची लागवड केली जाते. परंतु अनेक शेतकरी कमी पाण्यामुळे लागवड कमी करतील, अशी स्थिती आहे. तसेच केळी लागवडीवरही परिणाम होईल. पाणी कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे केळी पीक या भागात होरपळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com