Jayakwadi  Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Water Issue : ‘जायकवाडीत’ पाणी पोहोचण्याचीच प्रतीक्षा

Team Agrowon

Nashik News : नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर सुरुवातीला शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी व काही संघटनांकडून तीव्र विरोध झाला. मात्र अखेर शुक्रवारी (ता. २४) मध्यरात्री दारणा धरणातून ५६९६ क्युसेकने जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. तर आता गंगापूर, कडवा व मुकणे धरणांतून रविवारी (ता. २६) सकाळी पाणी सोडण्यात आले आहे.

गंगापूर धरण समूहातून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे. मात्र सुरुवातीला विसर्ग कमी असल्याने ते पोहोचण्यात अडचणी होत्या. त्यामुळे जलसंपदा विभागावर टीका झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे.

त्यामुळे नदीपात्रातील वस्तू, साहित्य, मोटारी, वाहने इत्यादी पात्राच्या बाहेर काढून घ्यावे. नदीप्रवाहात कोणीही प्रवेश करू नये. नदीपात्राजवळील धार्मिकस्थळी, तसेच पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. या पाण्यावर मराठवाड्याची तहान भागणार आहे.

जायकवाडी धरणामध्ये ६५ टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व नगर जिल्ह्यांमधून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहामधून एकूण ३.१४३ टीएमसी पाणी दिले जाणार आहे.

गंगापूर धरणातून सकाळी ६.५१ वाजता ५०६ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर पुढील दोन तासात त्यात वाढ करून १,०५५ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. पुन्हा दुपारी १.५१ मिनिटांनी त्यात चारपटीने वाढ करून ४, ७२६ क्युसेक करण्यात आला. मात्र पुढील अर्धा तासात दुपारी २.३० वाजता तो कमी करून ३, ६७१ क्युसेक ठेवण्यात आला. कडवा धरणातूनही दुपारी २ वाजता १६२४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर मुकणे धरणांतून विसर्ग ११०० क्युसेक करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT