Dam Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : पंधरा दिवसांत प्रकल्पांतील पाणीसाठा दुप्पट

Dam Water Stock : २६ जुलैअखेर असलेला प्रकल्पातील १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आता ३० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यासह प्रमुख प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने महिनाभरात प्रकल्पांतील पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. २६ जुलैअखेर असलेला प्रकल्पातील १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आता ३० टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

दरम्यान जिल्ह्यासाठी उपयुक्त असलेल्या धनेगाव (जि. बीड) येथील मांजरा धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत असून शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंत ३९ दशलक्ष घनमीटर (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने आणखी आवक सुरू असून धरणात पाणी योजना असलेल्या लातूरसह विविध गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मांजरा धरणानंतर दुसऱ्या मोठ्या माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्पात २८ दशलक्ष घनमीटर (२७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यासोबत आठ मध्यम व १३४ लघु पाटबंधारे प्रकल्पात मिळून ३०.३८ टक्के पाणीसाठा आला आहे. मांजरा धरणाची एकूण साठवण क्षमता २२४ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७६ दलममी आहे.

तर निम्न तेरणा प्रकल्पाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२१ दलघमी तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता ९१ दलघमी आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्पाची मिळून १२२ दलघमी साठवण क्षमता असून त्यापैकी सध्या प्रकल्पामध्ये ३८ दलघमी (३१.१७ टक्के) पाणी आहे. यात सर्वाधिक पाणी व्हटी (ता. रेणापूर) प्रकल्पात ८१ तर मसलगा (ता. निलंगा) प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा आहे.

रेणापूर प्रकल्पात ६०, घरणी प्रकल्पात २७ तर देवर्जन प्रकल्पात दहा टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित तावरजा (ता. लातूर) व तिरू (ता. उदगीर) प्रकल्पाच्या उपयुक्त साठ्यात अजून काहीच पाणी आलेले नाही. त्यासाठी दोन्ही प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. मांजरा नदीवरील पंधरा उच्चस्तरीय बंधाऱ्यात (बॅरेजेस) मुबलक पाणी आले असून सर्व बंधाऱ्यात मिळून सध्या ७०.८७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

पाण्याचा विसर्गही सुरू असून बंधाऱ्यात पाण्याची आवकही चांगली आहे. तेरणा नदीवरील सातही बंधाऱ्यात मिळून ७०.७० टक्के पाणी साठा असून सर्वाधिक ८१..२७ टक्के साठा लिंबाळा (ता. निलंगा) येथील बंधाऱ्यात झाला आहे. रेणा नदीवरील तीनही बंधाऱ्यात २१ टक्के पाणीसाठा कायम असून या बंधाऱ्यात पाण्याची आवक झालेली नाही. किल्लारी कवठा व सोनखेड बंधाऱ्यातही ६८ टक्के पाणी आले आहे. काही प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असून येत्या काळात प्रकल्पाचा साठा वाढण्याची आशा जलसंलदा विभागाला आहे.

दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पाऊस

दोन दिवसांच्या खंडानंतर लातूर व धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २३) रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. धाराशिव जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांमध्ये सरासरी २४.४ मिलिमीटर पाऊस झाला होता. यात सर्वाधिक ५१.५ मिलिमीटर पाऊस कळंब, ४०.८ मिलिमीटर पाऊस वाशी तर ३५.७८ मिलिमीटर पाऊस उमरगा तालुक्यात पडला.

कळंब व वाशी तालुक्यात पडलेल्या पावसामुळे मांजरा धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. लातूर जिल्ह्यातही २२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक ४७.५ मिलिमीटर पाऊस अहमदपूर तालुक्यात तर त्यानंतर ३९.५ मिलिमीटर पाऊस जळकोट तालुक्यात झाला. शनिवारीही दोन्ही जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. आणखी पावसाची शक्यता वर्तवली जात होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT