Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : जायकवाडीतून मिळणार रब्बीसाठी तीन आणि उन्हाळी पिकांसाठी चार अवर्तन

Water Rotation for Rabi and Summer Crops : सोमवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जायकवाडी धरणातून रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी आवर्तन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठवाड्यातील सर्वांत मोठा जायकवाडी प्रकल्प यंदा तुडुंब भरल्याने रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी आवर्तनाची चिंता मिटली आहे. तर सोमवारी (ता.२५) झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत धरणातून रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी आवर्तन सोडण्याची निर्णय घेण्यात आला आहे. यंदा रब्बी पिकांसाठी तीन आणि उन्हाळी पिकांसाठी चार आवर्तने सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती अभियंता प्रशांत जाधव यांनी माहिती दिली.

गेल्या वर्षी राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील पाण्याची भीषणता समोर आली होती. प्रकल्पात ५० टक्के ही उपयुक्त पाणीसाठा नव्हता. यामुळे पाण्याअभावी पिकांना फटका बसला होता. पण यंदा चित्र बदलले असून धरणात पाण्याचा मुबलग साठा झाला आहे.

तसेच मराठवाड्यातील इतर लहान-मोठे प्रकल्प देखील तुडुंब झाल्याने जवळपास २७ पाणीपुरवठा योजनांना पाणी मुबलक असणार आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत रब्बी पीकांसाठी एक तर उन्हाळी पीकांसाठी तीन आवर्तने अधिक दिली जाणार आहेत.

सध्या धरणातील पाणीसाठा शंभर टक्के असून रब्बी हंगामातील आवर्तन आज मंगळवार (ता.२६) पासून दिले जाणार आहे. याचा मराठवाड्यातील सुमारे १. ५० लाख हेक्टरवरील सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल. रब्बी हंगामातील आवर्तन मंगळवारी पैठण कालव्यातून सोडले जाईल. तर कालव्यातून २०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार आहे.

यंदा जायकवाडी धरणातून रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी एकूण सात आवर्तने मिळणार आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पैठण डाव्या कालव्यामुळे १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर तर उजव्या कालव्यामुळे ४१ हजार ६८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पाणी मिळणार आहे.

आवर्तन किती दिवसांचे

यंदा धरणातून रब्बी पिकांसाठी तीन आणि उन्हाळी पिकांसाठी चार आवर्तने सोडण्यात येणार असून एक अवर्तन साधारण २१ दिवसांचे असते. यामुळे रब्बी आणि उन्हाळ्यात तब्बल १४७ दिवस शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे.

यंदा खरीप पिकांना परतीच्या पावसामुळे फटका बसला होता. यामुळे शेतकऱ्याचे अतोनाम नुकसान झाले होते. त्यामुळे आता रब्बीच्या पिकांकडे शेकऱ्यांचे डोळे लागले आहेत. दरम्यान रब्बीसह उन्हाळी पिकांसाठी सात अवर्तनात पाणी देण्याचे नियोजन कालवा समितीने केल्याने केल्यामुळे यंदा रब्बीचे पीक दमदार येण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT