Pune News: खेड तालुक्यातील भीमा व भामा नद्यांवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली पाणीगळती लवकरच थांबणार आहे. तालुक्यातील १५ बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी जलसंपदा विभागाने तब्बल ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ही महत्त्वाची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या मंजुरीमुळे नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे..खेड तालुक्यातील भीमा-भामा नदीवरील अनेक कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत होती. ही स्थिती बदलण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला..Water Scarcity: मंडळपाडा सुविधांपासून वंचित.त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून १५ बंधाऱ्यांच्या उंबरठा, स्तंभ, संरक्षण भिंत व इतर दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता मिळाली आहे..Water Conservation: जलसंधारणाचे प्रश्न मार्गी लावा.दरम्यान, तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील १३ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात असून त्यासही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पुढील टप्प्यात चासकमान, भामा आसखेड येथील अंतर्गत बुडीत बंधारे, पूल कम बंधारे तसेच चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकरण व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामेही हाती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.....या गावांतील बंधाऱ्यांची कामे होणारभोमाळे, दोंदे, राजगुरुनगर, खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव तांबे वस्ती, भिवेगाव, शेलू, बोरदरा, कोरेगाव, पिंपरी, वाकी, शेलगाव, कोयाळी, सिद्धेगव्हाण या गावांतील कोल्हापुरी बंधाऱ्यांची गळती प्रतिबंधक व मजबुतीकरणाची कामे हाती घेतले जाणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.