Soybean Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Issue : संकटे शेतकऱ्यांची पाठ काही सोडेनात...!

Soybean Crisis News : सोयाबीनचे उत्पादन कमी, खरेदी विक्रीसाठी हमीभावाची केंद्रेच सुरू नाहीत. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे सोयाबीन घालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

हेमंत पवार

Satara News : पावसाअभावी सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर येऊन पिकाला अस्मानी संकटाचा फटका बसला. हाताशी मिळेल तेवढे सोयाबीन काढून बाजारात विक्रीसाठी आणले तर त्याच्या खरेदीसाठी हमीभावाची केंद्रेच सुरू नाहीत. त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे सोयाबीन घालण्याशिवाय पर्याय नाही.

सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ६०० असली तरी अनेक सातारा जिल्ह्यातील अनेक व्यापाऱ्यांकडून चार हजार २०० ते चार हजार ३०० रुपयांपर्यंत त्याची खरेदी केली जाते. त्यात ओलसरपणा बघून दर कमी केला जातो आहे. त्यामुळे यंदा संकटात बळीराजा चितपट झाला आहे.

खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले आहे. त्यांच्याकडे काढलेले सोयाबीन ठेवायची व्यवस्था नसल्याने त्यांनी काढून लगेच विक्रीस आणले. मिळेल त्या दराने त्याची विक्री करून मिळेल तेवढे पैसे घेतले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही व्यापाऱ्यांनीही किमान आधारभूत किमतीचा विचारच न करता वाट्टेल त्या दराने खरेदी सुरू ठेवली आहे. बाजारपेठेत उतारा बघून ४२०० ते ४४०० रुपये भाव दिला जात आहे. पणन विभागाने हमीभावाने खरेदी केंद्रेही सुरू केली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांकडे सोयाबीन घालण्याशिवाय पर्याय नाही.

क्विंटलला २०० ते ४०० रुपयांचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असतानाही त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली. महागडी खते टाकून पिके घेतली. ती पिके काढायला १५० रुपये गुंठ्याने मजूर पैसे घेत आहेत. त्यातच मळणी करायला ३५० ते ४०० रुपये पोत्याला घेतले जात आहेत.

घाम गाळून पिकवलेले सोयाबीन सरकारची खरेदी केंद्रे सुरू नसल्याने कमी दराने विक्री करावी लागत आहे. त्यातून काही व्यापाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. मात्र शेतकऱ्यांना क्विंटलला सुमारे २०० ते ३०० रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.

सोयाबीनचा हमीभाव चार हजार ६०० रुपये आहे. खरेदी चालली आहे ४२०० पासून. त्यातील ओलसरपणा पाहून अजून दर कमी केले जात आहेत. तरीही राज्याचे पणनमंत्री शेतकऱ्यांना सापडेना झालेत. सरकारला सोयाबीनला शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यायचे असतील तर सरकारने परदेशातून खाद्यतेल, पेंड आयात करू नये. सरकारने बाजार समित्यांना सूचना देऊन हमीभावापेक्षा कमी दराने करू नये असे बजावून त्याचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
- सदाभाऊ खोत, माजी पणनमंत्री
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीनची लागण मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यात यंदा ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र पावसाअभावी उत्पादन निम्म्यावर येणार आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना निश्चितपणे बसणार आहे.
-भाग्यश्री फरांदे, अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा
पावसाअभावी सोयाबीनला यंदा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच सोयाबीन काढून बाजारात नेल्यावर तेथे व्यापाऱ्यांकडून ४२०० ते ४३०० रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्याकडे कोणीही बघायला तयार नाही.
- नीलेश भोसले, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम

Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत

Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा

Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर 

SCROLL FOR NEXT