Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: महामार्गासाठी प्रतिकीमी ३० कोटींचा खर्च; शक्तिपीठसाठी १०७ कोटींचा कसा काय? राजू शेट्टींचा निशाणा

Maharashtra Politics : समृद्धी महामार्ग झाल्यानंतर राज्यात एका आमदाराचा दर ५० कोटी निघाला आणि ४० आमदार विकले गेले. शक्तिपीठ महामार्ग तर ८७ हजार कोटींचा आहे, हा महामार्ग झाल्यानंतर आमदाराचे दर किती निघतील?

sandeep Shirguppe

Maharashtra Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी सामान्यांची मागणी नव्हतीच असा दावा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. या महामार्गाच्या समर्थनार्थ कोणीही मोर्चा काढलेला नाही. ३५ कोटी प्रतिकीमी होणारा रस्ता १०७ कोटींना होत असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ३५ कोटी खर्च येत असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातून जोरदार विरोध होत असताना पहायला मिळत आहे. यावेळी शेट्टी म्हणाले की, मी केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेलो होतो त्यावेळी त्यांनी स्वत: सांगितलं आहे. सहापदरी रस्ता करण्यासाठी प्रतिकीमीसाठी अंदाजे ३० ते ३५ कोटींचा खर्च येतो परंतु शक्तिपीठ महामार्गााठीचा डीपीआर पाहिला तर तो खर्च १०७ कोटींचा दाखवला आहे. असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

यावेळी शेट्टी म्हणाले की, "३५ कोटींचा रस्ता १०७ कोटींना होत असेल तर यात काहीतरी गौडबंगाल आहे. तसेच १०७ कोटींमधील ७० कोटी कोणाला जातात हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महायुतीचा शपथविधी झाल्याबरोबर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग होणारचं असा नारा दिला". असा आरोप शेट्टी यांनी केला.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी घोषणा केली. शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून तीव्र विरोध होत आहे. शेतकऱ्यांना नाराज करून जबरदस्तीने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. शक्तिपीठाबाबतचा पुढील निर्णय हा सर्वांशी चर्चा करूनच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता. महायुती सरकाने प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यावरुनच आता शक्तीपीठ महामार्गाच्या भूमीअधिग्रहणाच्या खर्चावरुन राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

तर आमदारांचे दर किती निघतील?

"समृद्धी महामार्ग झाल्यानंतर राज्यात एका आमदाराचा दर ५० कोटी निघाला आणि ४० आमदार विकले गेले. शक्तिपीठ महामार्ग तर ८७ हजार कोटींचा आहे, हा महामार्ग झाल्यानंतर आमदाराचे दर किती निघतील? त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर असा एखादा रस्त्याचा प्रकल्प करा, तुम्ही आपोआप मुख्यमंत्री व्हाल अशी परिस्थिती आहे" असाही आरोप राजू शेट्टी यांनी फडणवीस यांचे नाव न घेता केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT