Bachchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Bachchu Kadu : मशाल पेटवून आमदारांच्या घरासमोर ११ एप्रिलला आंदोलन; कर्जमाफीसाठी 'प्रहार'चा आक्रमक पवित्रा

Karjmafi Farmer : बच्चू कडू यांनी प्रहारच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. या बैठकीत सरकारला शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क आठवावेत, यासाठी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवण्याची भूमिका जाहीर केली आहे.

Dhananjay Sanap

Loan Wavier Maharashtra : महायुती सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीला बगल दिल्याने शेतकऱ्यांसह विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी संघटना, कॉँग्रेस, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा आयोजित केले आहेत. त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी राज्यभरातील आमदारांच्या घरी जाऊन ११ एप्रिल रोजी मशाल पेटवण्याचे आदेश पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिला आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

बच्चू कडू यांनी प्रहारच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. या बैठकीत सरकारला शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क आठवावेत, यासाठी आमदारांच्या घरी जाऊन मशाल पेटवण्याची भूमिका जाहीर केली आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहारचे जिल्हाप्रमुख रात्रीच्या वेळी मशाल पेटवून सरकारचा निषेध आणि आमदारांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आमदारांच्या घरासमोर जाणार आहेत, असा इशारा प्रहारकडून देण्यात आला आहे.

राज्यातील शेतकरी महायुती सरकारकडून कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं आहे. परंतु आता मात्र पुढील तीन वर्ष कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी अलीकडेच जाहीर केली आहे. त्यावरून राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

तसेच नुकतेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कर्जमाफीबद्दलच्या विधानावरून शेतकरी आणि शेतकरी नेत्यांसह विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेही कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे. परंतु राज्य सरकार मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी सकारत्मक नाही. त्यासाठी आर्थिक स्थिती जेमतेम असल्याची कारण पुढे केले जात आहे.

राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीसह सरकारी धोरणांच्या लकव्याने तोट्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढला असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिस्थिती राज्य सरकारने मात्र कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे प्रहारने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांवर ३१ हजार कोटींचा कर्जाचा बोजा आहे. परंतु महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे शेतकरी पीक कर्ज भरण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी बँकांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुती सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी नेते करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT