Kaustubh Divegaonkar  Agrowon
ॲग्रो विशेष

IAS Kaustubh Divegaonkar: मी शेतकऱ्यांचा कलेक्टर कसा झालो ?

Article by Kaustubh Divegaonkar : मी उस्मानाबाद (आताचे धाराशिव) जिल्ह्यात असताना मला ‘शेतकऱ्यांचा कलेक्टर’ अशी जणू उपाधी मिळाली होती.

Team Agrowon

कौस्तुभ दिवेगावकर

मी उस्मानाबाद (आताचे धाराशिव) जिल्ह्यात असताना मला ‘शेतकऱ्यांचा कलेक्टर’ अशी जणू उपाधी मिळाली होती. या ठिकाणी मी जिल्हाधिकारी म्हणून सव्वादोन वर्षे काम केले. शेती हाच या जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय. हा जिल्हा शेतकरी आत्महत्याप्रवण म्हणून ओळखला जातो. या काळात मला शेती प्रश्‍नाची गुंतागुंत काही अंशी समजून घेता आली.

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा मानला जातो. शेती क्षेत्रासाठी कृषी खात्याइतकीच महत्त्वाची भूमिका या महसूल विभागाची आहे. जिल्हाधिकारी पदावर काम करताना वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेले शेतकऱ्यांचे प्रश्‍न लोकसहभागातून कसे सोडवता येऊ शकतात याचाही मला अनुभव आला. त्यातही प्रामुख्याने शेतरस्ते, पीकविमा, हवामान बदल आणि जलसंधारण या चार मुद्द्यांच्या अनुषंगाने मी केलेल्या या काही नोंदी.

शेतरस्ते मोहीम

मी जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच मला भेटायला आलेल्या लोकांच्या बोलण्यातून शेतरस्त्याची समस्या किती महत्त्वाची आहे, हे लक्षात आले. जसजशी लोकसंख्या वाढत गेली, तशी कुटुंबेही वाढली.

त्यामुळे जमीन विभागली गेली आणि शेतांचा आकार लहान होत गेला. गावाच्या नकाशात असलेल्या सध्याच्या शेतजमिनींच्या हद्दींवर अतिक्रमणे करून रस्ते अडविण्याची प्रकरणे वाढली. गावातील काही लोकांनी रस्त्यांवर अतिक्रमण केल्याने गावांमध्ये असंतोष, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते.

त्याचबरोबर शेतकऱ्यांची इच्छा असूनही रस्त्यांअभावी ऊस, केळी, इतर फळबागा अशी नगदी पिके घेणे शक्य होत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पेरणी वेळेवर करता येत नाही. कापणीसाठी हार्वेस्टर शेतात नेणे शक्य होत नाही.

शेतरस्त्यांच्या अनेक केसेस महसूल अधिकारी न्यायालयात प्रलंबित होत्या. रस्त्यात अडथळा निर्माण झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडेही करण्यात आलेल्या होत्या. शेतातील रस्ते खुले करण्याचे आदेश तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही प्रत्यक्ष शेतात अंमलबजावणी होत नव्हती.

शेतरस्त्याच्या समस्येमुळे शेती विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा आला होता. ही सगळी स्थिती समजून घेतली आणि जिल्ह्यात डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘अतिक्रमणमुक्त शेतरस्ते’ ही मोहीम राबवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT