Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : केळी पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्यांकडून तक्रार अर्ज

Team Agrowon

Jalgaon News : रावेर तालुक्यातील केळी पीकविमा कंपनीने नाकारलेल्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत अडीच हजार तक्रार अर्ज दाखल केले आहेत. रावेर तालुक्यातील सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांचा केळी विमा कंपनीने नाकारला आहे.

रावेर येथे तालुका कृषी कार्यालय व ॲग्रिकल्चर इंडिया इन्शुरन्स कंपनी कार्यालयात केळी पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्याकडून तक्रार अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तालुका कृषी कार्यालयात तीन ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात येत आहे. आजअखेर २ हजार ५५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे.

जिल्ह्यातील ५३ हजार ८०० शेतकऱ्यांना परतावे दिल्याचे शासन, विमा कंपनी सांगत आहे. परंतु यातील अनेक शेतकरी परताव्यांपासून वंचितच आहेत. बँकेत निधी जमा झाल्याचे संदेशही आले, परंतु हा परतावा निधीच बँक खात्यात आलेला नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केळी शेतात असूनही प्रस्ताव नामंजूर

जिल्ह्यातील १० हजार ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नामंजूर केले आहेत. यातील रावेर, यावल, जळगाव, चोपडा भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केळी असूनही त्यांचे विमा प्रस्ताव नामंजूर केले आहेत. विमा कंपनीने एमआरसॅकच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे चुकीची केळी पीक पडताळणी केली. अनागोंदी केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT