Lightning Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Lightning Alert: ४०० मीटरच्या परिघात वीज कोसळण्याची पूर्वसूचनेसाठी अॅप विकसित करणार; मंत्री महाजनांनी दिली माहिती

Girish Mahajan : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात वीज कोसळण्याची पूर्वसूचना देण्याची यंत्रणा विकसित करण्यासंदर्भात आमदार संतोष दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री महाजन यांनी सभागृहात माहिती दिली.

Dhananjay Sanap

Vidhimandal Live 2025 : शेतकरी, शेतमजुरांसाठी ४०० मीटरच्या परिघात वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारं अॅप विकसित करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती बुधवारी (ता.२) राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात वीज कोसळण्याची पूर्वसूचना देण्याची यंत्रणा विकसित करण्यासंदर्भात आमदार संतोष दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री महाजन यांनी सभागृहात माहिती दिली.

नवीन अॅपबद्दल माहिती देताना गिरीष महाजन म्हणाले, "वीज कोसळून शेतकरी आणि शेतमजुर मृत्यूमुखी पडतात. सध्या 'सचेत' आणि 'दामिनी' या दोन अॅपमधून ४० किलोमीटरच्या परिघात पडणाऱ्या विजेची पूर्व सूचना दिली जाते. परंतु आता ४०० मीटरमध्ये कोसळण्याऱ्या विजेची पूर्वसूचना देण्यासाठी अॅप विकसित करण्याचं काम सुरू आहे."

मंत्री महाजन यांच्या उत्तरावर कॉँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी वीज पडून मृत्यूमुख्यी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना वाढीव मदत द्यावी, अशी मागणी केली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी वीज कोसळून शेतकऱ्यांचं पशूधन दगावलं तर देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी केली.

मंत्री महाजन यांनी राज्यात गाई-म्हशीसाठी मदत देण्यात येत असल्याचं सांगितलं. "वीज कोसळून मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना राज्य सरकार ४ लाख रुपये मदत देतं. गाय, म्हैस आणि बैल यासारख्या मोठ्या पशूधनासाठी ३७ हजार ५०० रुपये दिले जातात. तर शेळी मेंढीसाठी ४ हजार रुपये आणि कोंबडीसाठी १०० रुपये दिले जातात. कोंबडीसाठी १०० रुपयेच दिले जातात. ही मदत कमी आहे. त्यामुळे रक्कम वाढवून देण्याबद्दल विचार करू." असं महाजन म्हणाले.

आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्यास २५ लाख आणि वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्यास ५ लाख मदत देण्यात येते, हा फरक का करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत देण्याची मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर यांनी वीज कोसळणं नैसर्गिक आपत्ती आहे, तर वाघाचा हल्ला हा मानवी हस्तक्षेपामुळे आहे, असं म्हणत दोन्हीच्या आर्थिक मदतीत फरक राहणार असल्याचं सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: सामूहिक अभयदान योजना

Farmer Struggles: महाग कृषी निविष्ठांमुळे केळी बागायतदार जेरीस

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Code of Conduct Violation Case: मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी  कारवाईस आयोगाची टाळाटाळ

SCROLL FOR NEXT