Manikdoh Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity: शेतकऱ्यांचे डोळे आवर्तनाकडे

Kukdi Water Project: कुकडी डावा, मीना शाखा, घोड, डिंभे उजवा या कालव्यात आवर्तन सोडण्याबाबत व पिंपळगाव जोगे धरणातील मृत पाणी साठ्याचा वापर कुकडी डावा कालव्यासाठी कसा करता येईल, याबाबत निर्णय घेणार येणार आहे.

Team Agrowon

Narayangaon News: कुकडी प्रकल्प उन्हाळी हंगाम सन २०२४-२५ च्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे सोमवारी (ता. ५) सायंकाळी होणार आहे.

या वेळी कुकडी प्रकल्पातील धरणांत उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून प्रामुख्याने कुकडी डावा, मीना शाखा, घोड, डिंभे उजवा या कालव्यात आवर्तन सोडण्याबाबत व पिंपळगाव जोगे धरणातील मृत पाणी साठ्याचा वापर कुकडी डावा कालव्यासाठी कसा करता येईल, याबाबत निर्णय घेणार येणार आहे.

कुकडी प्रकल्पात आजअखेर ३.४०९ टीएमसी (११.४९ टक्के) नीचांकी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. प्रकल्पीय पाणीसाठ्याची सद्यःस्थिती पाहता या पुढील काळात शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही.

मात्र, कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पिण्यासाठी सर्व कालव्यात पाणी कसे सोडता येईल, या बाबतचा निर्णय होणार आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.पिंपळगाव जोगे धरणात ०.२७४ टीएमसी अत्यल्प उपयुक्त पाणी साठा शिल्लक असून, सुमारे साडेतीन टीएमसी मृतसाठा शिल्लक आहे.

सद्यःस्थितीत पिंपळगाव जोगे धरणातून पिंपळगाव जोगे कालव्यात २२५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ जुन्नरचा पूर्व भाग व पारनेर शेतकऱ्यांना होत आहे. पिंपळगाव जोगे धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर धरणातील मृतसाठा येडगाव धरणात सोडण्यात येणार आहे. येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात आवर्तन सुरू करण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

शेतकरी आक्रमक

पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाल्याने शेतकरी उन्हाळी आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. मीना शाखा कालव्यात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मीना व कुकडी नदीवरील कोल्हापूर बंधारे कोरडे पडले असल्याने नदीत पाणी सोडावे, यासाठी शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

भूजल पातळी खालावली

नारायणगावच्या पूर्व भागातील नारायणगाव, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव या भागात मीना शाखा कालव्यालगत शंभर टक्के बागायती क्षेत्र आहे. या भागात मागील एक महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. द्राक्ष बागा व इतर पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी विंधन विहिरींची खोदाई सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Resigns: अखेर कोकाटेंना मंत्रीपद सोडावं लागलं, त्यांचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला

Sugarcane Price: दीड महिन्यानंतरही १२ साखर कारखान्यांकडून ऊसदर नाहीच

Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे शेतकऱ्यांचा कल

Land Records: मंडलस्तरावर दर मंगळवारी होणार फेरफार अदालत

Sugarcane Payment Delay: शेतकऱ्यांची बिले थकवली, 'काटामारी'चाही गंभीर प्रश्न, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT