Paddy Seeds
Paddy Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Seeds : रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६ हजार क्विंटल भात बियाण्यांची मागणी

Team Agrowon

Ratnagiri News : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भात बियाणे तसेच खताची वेळेवर उपलब्धता व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सहा हजार क्विंटल भात बियाणे तसेच १४,६४१ टन खताची मागणी करण्यात आली आहे.

खते व बियाण्यांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून खते व बियाण्यांची मागणी दोन महिने आधीच करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७०,५७२ हेक्टर क्षेत्रावर भात, १०,२३६ हेक्टर क्षेत्रावर नागली, ७३७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य व ५५३.९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात येते.

त्यासाठी युरिया, संयुक्त, एसएसपी, एमओपी, डीएपी या खतांची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने खताचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

खताची विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त ३५० खत विक्रेते असून, पॉस मशिनधारक २००, तर उर्वरित १५० शेतकरी मोबाइल ॲपद्वारे खत विक्री करतात. शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर पुरवठा व्हावा, वितरणात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

खताचा प्रकार व नोंदवलेली मागणी (टनामध्ये)

युरिया ७६००

संयुक्त ४६००

एसएसपी ९००

एमओपी ३००

डीएपी ६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT