Yavatmal News : पावसाचे दोन महिने उलटले तरी दमदार सरींचा अभाव असल्याने शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. वातावरणातील सततच्या गारव्यामुळे आणि रिमझिम पावसामुळे कपाशी पिकांवर मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
भिजपावसामुळे पिकात गवताचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी महागडी कीटकनाशके फवारावे लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कधी उन्हाचा तडाखा तर कधी रिमझिम पावसाचा क्रम सुरू आहे. त्यामुळे कीड वाढीस पोषक असे वातावरण तयार झाले आहे.
या किडीचे नियंत्रणासाठी वारंवार फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादकता खर्चातही वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांची चिंता
पावसाळ्याचे दोन महिने संपले, आता फक्त श्रावण महिना उरला आहे. सुरुवातही भिज पावसानेच झाली आहे. ‘बैल पोळा झाला की पाऊस भोळा’ असे जुने जाणकार सांगतात. त्यामुळे श्रावणात जोरदार सरी न आल्यास उत्पन्नात मोठी घट होणार, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
श्रावण महिन्याची सुरुवात असूनही नाले, केटीवेअर, पाझर तलाव, विहिरी कोरड्याच आहेत. दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून हंगाम लांबण्याची चिन्ह आहेत.
कपाशी पिकावर माव्याचे आक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. माझ्या दहा एकर कपाशीवर कीटकनाशकाची फवारणी केली आहे. पिकांना आता जोरदार पावसाची गरज आहे."- अशफाक सय्यद, प्रगतिशील शेतकरी, सूकळी, ता. आर्णी
कापसाचे पीक तीन महिन्यात तयार होते, पण दमदार पाऊस नसल्याने दोन महिन्यांनंतरही वाढ नीट झालेली नाही. वातावरणातील गारव्यामुळे पिकांवर रोग वाढत असून कीटकनाशकांचा खर्च वाढता आहे."- दिलीप शिंदे, शेतकरी, तेडोळी, ता. आर्णी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.