Chief Election Commissioner Rajeev Kumar Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील निवडणुंकांसाठी आयोग सज्ज, मात्र तारखा गुलदस्त्यात

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शुक्रवारी आढावा घेतला. तसेच शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक तारखा गुलदस्त्यात ठेवल्या. तसेच निवडणुका एक की दोन टप्प्यात होणार याची लवकरच माहिती देवू, असे सांगितले आहे. यावेळी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उपस्थित होते.

यावेळी राजीव कुमार यांनी, मतदानाचा दिवशी सर्व आस्थापनांनी पगारी सुट्टी देण्याची सुचना केल्याचे सांगितले आहे. तर जे अधिकारी तीन वर्षांपासून निवडणुक प्रक्रित आहेत त्यांच्या बदल्या केल्या जातील असेही राजीव कुमार यांनी सांगितले आहे. तर यावेळी निवडणुकांच्या तारखा आणि निवडणुका एक की दोन टप्प्यात होणार माहिती त्यांनी स्पष्ट केलेली नाही. त्या लवकरच तारखा जाहीर केल्या जातील असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकीच्या तारखांवरून असणारी उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

राज्यातील जनता 'माझा हक्क माझे मत' याप्रमाणे मतदान करतील. २६ नोव्हेंबर रोजी कार्यकाळ संपणार आहे. यामुळे याआधी विधानसभा निवडणूक घ्यावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी झाली असून विधानसभेचे एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात एससीचे २९ आणि एसटीचे २५ मतदारसंघ आहेत. तर नोंदणीकृत मतदारांची संख्या ९.५९ कोटी आहे. यापैकी पुरूष मतदार - ४.५९ कोटी आणि महिला मतदारांची संख्या ४.६४ कोटी आहे. तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या देखील ६ हजार आहे. ८५ वर्षांच्या पुढचे मतदार १२.४८ लाख असून पहिल्यांदाच मतदान करणारे मतदार १९.४८ लाख मतदार आहेत. राज्यात १ लाख १८६ मतदान केंद्र असून ९ लाख नवीन महिला मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. तसेच मतदान १०० टक्के होण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरी विभागात बुथवर १०० टक्के आणि ग्रामीण भागात ५० टक्के सीसीटीव्ही लावण्यात येतील, अशी माहिती दिली.

राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांच्या अनुशंगाने सर्व राजकीय पक्ष आणि शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये ११ राजकीय पक्षांशी साधण्यात आला. यावेळी राजकीय पक्षांनी दिपावली आणि छट पुजेचा विचार करून निवडणुकांची तारीख जाहीर करावी. शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, मतदान केंद्रावर मतदाना वेळी योग्य तयारी करण्यात यावी. त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विचार व्हावा. तर पोलिंग एजंट त्याच मतदान केंद्राचा असावा, खर्चाचा विचार करून वाढवावा. फेक न्यूज वर देखील काम करावे, अशा मागण्या करण्यात आल्याचेही राजीव कुमार म्हणाले.

राजीव कुमार यांनी सण उत्सवाचा विचारकरून निवडणूकबाबत विचार केला जाईल, अशी माहिती दिली. तसेच राजीव कुमार यांनी, ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राजकिय पक्षांना नियम पाळत गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

प्रत्येक केंद्रावर व्हिलचेअर, रॅम दिव्यांगासाठी करण्यात येतील. पाणी, लाईटची व्यवस्था करण्यात येईल. तर जेथे लांब लाईन लागणारी ठिकाणे आहेत तेथे मतदारांना बसण्याची व्यवस्था केली जाईल. तर यावेळी देखील वयोवृद्धांचे घरात जाऊन फार्म डी च्या माध्यमातून मतदान घेतले जाईल. पण अनेक वृद्धांची अशी इच्छा असते की ते घराबाहेर पडून मतदान करण्यास येतात. त्याप्रमाणे तरूणांनी देखील घराबाहेर पडावे, असे आवाहन कुमार यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT