Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Sharad Pawar on PM Modi : मोदी यांना ऊस, शेती यांचे मर्यादित ज्ञान आहे,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदीं यांच्यावर गुरुवारी (ता.२) पत्रकार परिषदेत टीका केली.

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘कांदा निर्यातीला बंदी घातली हे चुकीचे आहे. मी कृषिमंत्री असताना कांदा उत्पादकांच्या बाजूने होतो. ती नीती आता राहिलेली नाही. दहा वर्षांत उसाला ३०० रुपये दर वाढवून दिला, असे मोदी म्हणतात. मुळात एफआरपी आम्ही सुरू केली. त्यात विनाप्रयत्न वाढ व्हावी अशी तरतूद केली. त्यामुळे वाढ मिळत जाते. मोदी यांना ऊस, शेती यांचे मर्यादित ज्ञान आहे,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदीं यांच्यावर गुरुवारी (ता.२) पत्रकार परिषदेत टीका केली.

‘‘पंतप्रधानपदाची यापूर्वी कधी झाली नव्हती इतकी सर्वाधिक अप्रतिष्ठा नरेंद्र मोदी यांच्याकडून होत आहे. सत्य सोडून सगळे सांगत असल्याने जनता नाराज असून महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी असलेले चित्र आता बदलले आहे ‘‘मतदानाची टक्केवारी कमी होण्यासाठी लोकांची उदासीनता, नाराजीबरोबरच कडक उन्हाळाही कारणीभूत आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मतदानाला बाहेर पडले नाहीत. महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी मोदींचे वातावरण होते. पण आता शेतकरी नाराज आहेत. तरुणांमधील उत्साह कमी दिसतो. त्यामुळे येथे चित्र बदलले आहे. त्याची चिंता भेडसावत असल्याने तमिळनाडू, मध्य प्रदेशात एकच टप्पा असताना महाराष्ट्रात पाच टप्पे केले. जास्तीत जास्त मतदार संघात पंतप्रधान जावेत याची त्यांनी काळजी घेतली असल्याचे दिसते.’’

सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे सांगत पवार म्हणाले, की पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अजून सांगितलेली नाही. दोन दिवसांनी केवळ टक्केवारी जाहीर केली. त्यातही वाढ झाली. हा प्रकार काळजी करण्यासारखा आहे. त्याची माहिती घ्यावी लागणार आहे. यापूर्वी झालेल्या मतदानात मोदी आघाडी पुढे आहे असे धडधडीत खोटे सांगितले जात आहे. इंडिया आघाडीत पाच वर्षांत पाच पंतप्रधान करणार हा जावई शोध कुणी लावला, मोदींना हे दिवास्वप्न पडत आहे. त्यांच्याच डोक्यातून निघाले आहे. हे आमच्या डोक्यात नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत त्याची चर्चा झालेली नाही.

‘लोकशाही स्वातंत्र्याशी मोदींना देणेघेणे नाही’

तासगाव, जि. सांगली : भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नसलेल्या संघटनेचे पंतप्रधान सत्तेत आहेत. त्यांना लोकशाही स्वातंत्र्य यांच्याशी देणेघेणे नाही म्हणूनच मोदी यांच्यावर टीका करणाऱ्याला तुरुंगात टाकण्याचे काम मोदी करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

तासगाव येथे गुरुवारी (ता. २) सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, नितीन बानुगडे पाटील, संजय विभुते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: डाळिंबाचा रंग, आकार, दर्जा उत्तम राखण्यावर भर

Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

SCROLL FOR NEXT