Collector Siddharam Salimath  sakal
ॲग्रो विशेष

Disaster Situation : संभाव्य आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी सतर्क राहावे

Collector Siddharam Salimath : मॉन्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी आपापल्या पातळीवर नियोजन करून सतर्क राहावे असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

Team Agrowon

Nagar News : मॉन्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी आपापल्या पातळीवर नियोजन करून सतर्क राहावे असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मॉन्सून पूर्वतयारी आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे हे प्रत्यक्ष तर शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्‍य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, की नगर जिल्ह्यातील मॉन्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वोतोपरी सज्ज राहावे. जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

त्यामुळे निवाऱ्यांची पाहणी करून त्याबाबत नियोजन असावे. त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पांसह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पाहणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करून घेण्यात यावी. आपत्तीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा तसेच दूरध्वनी सेवा अखंडित सुरू राहण्याबाबत दक्षता घ्यावी.

पूरप्रवण, तलाव क्षेत्रामध्ये गावशोध व बचाव पथक सज्ज असावेत. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे अनेकवेळा अपघात घडतात. ज्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साठून अपघात घडतात अशा अपघातांच्या ठिकाणी बोर्डस, रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. पाऊस व वाऱ्यामुळे झाडे रस्त्यांवर उन्मळून पडतात अशी झाडे तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनावरांना मुबलक प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता ठेवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

'शाळा, अंगणवाड्यांची दुरुस्त करा’

पावसाळ्यात शाळा पडण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी नगर जिल्ह्यातील शाळाखोल्यांची, अंगणवाड्यांची गरजेनुसार दुरुस्ती करून घेण्यात यावी. आपत्तीच्या काळात २४ तास नियंत्रण कक्ष सरू राहील, याची दक्षता घ्यावी. महानगरपालिका व नगरपालिका हद्दीमध्ये धोकादायक असलेल्या इमारतींची पाहणी करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

शहरांमध्ये ड्रेनेज चोकअपमुळे अनेकवेळा पाण्याचा निचरा होत नाही. ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी. आपत्तीच्या काळामध्ये झालेल्या नुकसानीचे संयुक्तरित्या पंचनामे करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT