Cotton Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : कापूस नुकसानीच्या ‘त्या’पूर्वसूचना गृहीत धरा

अनिल जाधव

Pune News : कापूस नुकसानीचा चुकीचा पर्याय निवडून पर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांचे क्लेम नाकारत कंपन्यांनी पंचनामे केले नाहीत. पण या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. राज्य शासनाने विमा कंपन्यांना दणका देत शेतकऱ्यांनी दिलेल्या पूर्वसूचना ग्राह्य धरण्याच्या सूचना गुरुवारी (ता. ४) शासनाने पत्राद्वारे विमा कंपन्यांना दिल्या आहेत.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. पण नुकसानीच्या पूर्वसूचना देताना चुकीचा पर्याय निवडला म्हणून विमा कंपन्यांनी क्लेम नाकारल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांनी सांगितले की, कापूस पीक शेतात उभे असतानाही पूर्वसूचना देताना काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला, त्यामुळे क्लेम नाकारला, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

पीकविमा योजनेच्या नियमानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेले नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत येते. यात गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आगीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन भरपाई दिली जाते. त्यानुसार शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या.

पण कापूस पिकाच्या पूर्वसूचना देताना अनेक शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसानीचा पर्याय निवडला. पीकविमा योजनेच्या नियमानुसार, ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते, अशा पिकांसाठी काढणी पश्चात नुकसानीअंतर्गत पूर्वसूचना द्यावी. म्हणजेच कापूस काढणी पश्चात नुकसान या पर्यायात बसत नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे कापूस पिकाच्या नुकसानीच्या पूर्वसूचना देताना उभ्या पिकाचे नुकसान हा पर्याय निवडणे आवश्यक होते. पण शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला.

कंपन्यांनी नियमावर बोट ठेवत चुकीचा पर्याय निवडला म्हणून कंपन्या क्लेम नाकारत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहणार होते. कृषी विभागाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने विमा कंपन्यांना दणका देत या पूर्वसूचना ग्राह्य धरण्याचे आदेश दिले. नजरचुकीने काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी ९ विमा कंपन्यांसाठी काढेल्या पत्रात म्हटले आहे की, खरीप हंगाम २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे विविध पिकांचे नुकसान झाले. त्यात कापूस पिकाचे देखील नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त विमा अर्जदारांनी विमा कंपनीला नुकसानीची सूचना देणे आवश्यक आहे.

त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सूचना दिल्या. मात्र काही सूचना नजरचुकीने काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत देण्यात आल्या. वास्तविकपणे या कालावधीत कापूस पिकाची वेचणी चालू होती, तसेच कापूस पिकाकरीता काढणी पश्चात नुकसान बाब लागू होत नाही.

त्यामुळे विमा अर्जदारांनी कापूस पिकासाठी नुकसानीच्या ज्या सूचना काढणी पश्चात नुकसान या बाबी खाली दिलेले आहेत, त्या सर्व सूचना आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गृहीत धरून नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार उचित कार्यवाही करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT