Agriculture
Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Mahatma Phule : महात्मा फुले यांचे कृषी विचार

Team Agrowon

दोन दिवसांपूर्वी महात्मा फुले (Mahatma Phule) यांचा स्मृतीदिन सर्वत्र साजरा करण्यात आला. सामाजिक सुधारणा (Social Reforms), शिक्षण, स्त्री प्रश्नांप्रमाणेच महात्मा फुले यांच्या कार्यातील कृषी (Agriculture And Mahatma Phule) हा महत्त्वाचा विचार होय. हवामानातील बदल, अवेळी पर्जन्यवृष्टी आणि बदलता बाजारभाव अशी अनेक आव्हाने आजही शेतकऱ्यांसमोर उभी आहेत.

त्यावेळी महात्मा फुले यांनी पारंपरिक शेतीला विरोध दर्शविला. ते म्हणत असत आधुनिक यंत्राद्वारे व अद्ययावत पद्धतीने शेती करावयास पाहिजे. महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार हे मर्यादित नव्ह, तर संपूर्ण मानव जातीचा विचार करणारे आहेत. सामाजिक समता, आर्थिक सुबत्ता, कृषी संस्कृतीची समृद्धता आणि निकोप एकता यांचा विचार त्यात सामावलेला आहे.

देशाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासाचा पाया कृषीक्षेत्राशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या, अडचणी व प्रश्नांवर विचारच करून चालणार नाही तर त्याबाबत विधायक मार्ग शोधून प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक आहे. यातून शेतकरी समृद्ध होईल, भूमि आणि भूमिपुत्र यांच्याशिवाय कृषिप्रधान देशात सर्वांगीण विकास साधता येणार नाही अशी त्यांची धारणा होती.

महात्मा फुले यांच्या कालखंडात शेतकऱ्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत होते. कर्ज घेणे त्याची परतफेड करणे यातच शेतकऱ्याचे सर्व उत्पादन संपायचे व पुन्हा पुढल्या वर्षी कर्ज घेणे, त्या कर्जावर अवाजवी व्याज आकारणी होत असे, शेतकऱ्याकडून पैसा लुबाडून शहरात सुधारणा करण्यात येत होत्या.

त्यामुळे त्या काळातील ‘सावकार’ मंडळी व्याज व्यवहार म्हणजे ‘सावकारकी’ मोठ्या प्रमाणात करत असत. शेतकरी आणि त्याचे कुटुंबिय अडाणी आणि अज्ञानी असल्यामुळे त्याचा फायदा समाजातील ‘धनदांडगे व शासन घेत होते. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला होता. शेतीमालाला निश्चित भाव नव्हता, बाजारात शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने घेतला जाई. सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना पगार चांगला होता, त्यांना सोयी सवलती होत्या. मात्र, शेतकरी या सर्व सवलतीपासून ‘वंचित’ होता.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजरी व दरिद्री जीवनाचा साकल्याने, सातत्याने अभ्यास केला आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून ब्रिटीश सरकारकडे अनेक गोष्टींची मागणी केली. यात प्रामुख्याने कर्जमाफी, शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने कर्ज (अर्थ सहाय्य), शेती उत्पादनवाढीसाठी, सवलतीसाठी त्यांनी आग्रह धरला होता.

जेव्हा दुष्काळी परिस्थिती असेल तेव्हा सर्व प्रकारची कर्जमाफी मिळावी म्हणून ते प्रयत्न करत होते. नवनवीन बी-बियाण्याचा वापर, पाणी पद्धतीचा वापरही नियोजनबद्ध असावा असा त्यांचा आग्रह होता.

काही भागात जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. पावसाच्या पाण्याने ती वाहून जाऊ नये म्हणून, बांध-बंधारे, वृक्षारोपण करणे यासाठी वेळ पडल्यास लष्कर व पोलिसांचीही मदत घ्यावी, असे महात्मा फुले यांनी सुचविलेले आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य, पाण्याचे योग्य नियोजन, शेतीविषयक पिकांचे प्रदर्शन व शेतीविषयक माहितीच्या परिसंवादरूपी चर्चा व्हाव्यात, शेतीसाठी उपयुक्त अवजारे सवलतीच्या दरात पुरवावीत.

शेतकऱ्यांनी आपल्या कष्टातून कमविलेल्या उत्पादनास योग्य दाम मिळावा या बाबीही महात्मा फुले यांनी प्रकर्षाने सुचिवल्या आहेत. आजच्या शेतकऱ्यांच्या ‘आत्महत्या’ रोखावयाच्या असतील तर महात्मा फुले यांनी सुचविलेले हे कृषी विचार, उपाय अमलात आणण्याची नितांत गरज आहे. महात्मा फुले यांचे जलसंधारण विषयीचे आणि एकूण शेतीविषयक विचार आजच्या युवापिढीला मार्गदर्शक आहेत.

- कृषिमित्र अरुण आदलिंगे,

वाई जि. सातारा (९८२२९१७७०७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT