Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Team Agrowon

Jalgaon News : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून केळी पिकासंबंधी जिल्ह्यात विमा संरक्षण घेतले जात आहे. यात नियमबाह्यपणे या योजनेत केळी पिकास विमा संरक्षण घेतल्यासंबंधी थेट कारवाईसत्र राबविले जात आहे. शेतात प्रत्यक्ष जाऊन केळी पीकपाहणी व करारनाम्यांबाबत विशेष खबरदारी विमा कंपनीसह कृषी विभाग घेत असल्याची माहिती मिळाली.

फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातून केळी पिकासाठी विमा संरक्षण अन्य फळ पिकांच्या तुलनेत अधिक असते. परंतु या योजनेत अनेकदा नियमबाह्य सहभागाच्या तक्रारी व त्यामुळे घोळ वाढल्याचाही प्रकार झाला. यंदा भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) यासंबंधीचे काम जिल्ह्यात करीत आहे. मागील हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते.

यंदाही केळी पिकासाठी या योजनेतून विमा संरक्षण दिले जात असून, त्यासंबंधी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आहे. या योजनेत लीजवर शेती घेऊन त्यात केळी लागवड करणारे शेतकरीदेखील केळी पिकास विमा संरक्षण घेऊ शकतात. परंतु यासाठी नोंदणीकृत (रजिस्ट्रार) करारपत्र आवश्यक आहे. या करारपत्राशिवाय योजनेत सहभाग घेता येत नाही. या करारपत्रासंबंधीच्या विमा योजनेतील सहभागाबाबत विशेष लक्ष आहे. त्याबाबत कसून चौकशी व पडताळणी केली जात आहे. कारण बनावट करारपत्र सादर करून केळी पिकासाठी विमा संरक्षण घेऊन शासनासह विमा कंपनीची फसवणूक होऊ शकते, असा संशय आहे.

सहभागानंतर तिसऱ्या दिवशी जिओ टॅगिंग

विमा योजनेत केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच काही वेळेस कृषी विभागाचे कर्मचारी थेट संबंधित क्षेत्रात जाऊन केळीची लागवड केली आहे का, जेवढी लागवड केली आहे, तेवढ्याच क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले आहे का, केळी बाग उत्पादनक्षम आहे का, याची तपासणी करीत आहेत. त्यासाठी शासनाकडून प्राप्त माहिती, नकाशा आदी बाबी जुळवून जिओ टॅगिंग करून घेतली जात आहे. यात केळी न लागवड करताच विमा संरक्षण घेतल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा हप्ता शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे. तसेच गरज पडल्यास फौजदारी कारवाईदेखील करण्याचा पवित्रा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

फळपीक विमा योजना केळी पिकासाठी महत्त्वाची आहे. यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी पिकाची पाहणी किंवा जिओ टॅगिंग लागलीच केली जात आहे. करारनाम्यांबाबतही चौकशी व कसून पडताळणी केली जात आहे. यात गैरप्रकार आढळल्यास शासनादेशानुसार थेट कारवाईसत्र राबविले जात आहे. केळीची लागवड न करताच विमा संरक्षण घेतल्याचे दिसल्यास शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता शासनाकडे जमा करण्याची तरतूदही आहे.
राहुल पाटील, जिल्हा समन्वयक, भारतीय कृषी विमा कंपनी, जळगाव
शेतकऱ्यांनी नियमबाह्यपणे केळी पिकासाठी फळपीक विमा योजनेतून विमा संरक्षण घेऊ नये. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास आपण लढा देऊ शकतो. पण नियमबाह्यपणे कुठल्याही योजनेत सहभागी होणे योग्य नाही. विमा कंपनी कारवाई करून विमा हप्ताही शासनाकडे जमा करीत आहे. यामुळे ज्यांनी केळीची लागवड केली आहे, त्यांनीच विमा योजनेत सहभाग घ्यावा.
किरण गुर्जर, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT