Fruit Crop Insurance : सिंधुदुर्गला मिळणार आंबा, काजू पीकविम्याचे ६७ कोटी

Mango and Cashew Insurance : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ हजार ३५० आंबा, काजू बागायतदारांना ६७ कोटी ९४ लाख ३ हजार ४८० रुपयांचा पीकविमा परतावा मिळणार आहे.
Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४१ हजार ३५० आंबा, काजू बागायतदारांना ६७ कोटी ९४ लाख ३ हजार ४८० रुपयांचा पीकविमा परतावा मिळणार आहे. जिल्ह्यातील दहा मंडले विमा परताव्यास अपात्र ठरली आहेत. तर आंबेरी मंडल आंबा, काजू या दोनही पीकांकरिता अपात्र ठरले आहे

पीकविमा योजनेत सिंधुदुर्गातील आंबा, काजू या दोन फळपीकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र, तर काजू पिकाखालील ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र असे एकूण १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. या योजनेत ४२,१९० शेतकऱ्यांनी १२ कोटी ८५ लाख रुपये स्वहिस्सा भरून क्षेत्र संरक्षित केले होते.

Fruit Crop Insurance Scheme
Crop Insurance: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीकविम्याचे ६५६ कोटी

परंतु जोखीम कालावधी १५ मे रोजी संपल्यानंतर शेतकऱ्यांकडून पीकविमा परताव्याची मागणी होऊ लागली होती. जिल्ह्यातील शेतकरी संघटना, ठाकरे शिवसेनेने पीकविमा परतावा मिळावा याकरिता आंदोलन छेडले होते. परंतु राज्य आणि केंद्र शासनाने आपापला हिस्सा विमा कंपनीकडे न भरल्यामुळे कंपनीकडून पुढील कोणतीही प्रकिया करता आली नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने आपला हिस्सा विमा कंपनीकडे भरणा केला आहे.

Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance : सांगलीतील अडीच हजारहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला फळ पीकविमा

केंद्र शासनाचा हिस्सा अजूनही भरणा केलेला नाही. परंतु विमा कंपनीने जिल्ह्यातील कोणत्या मंडलांतील शेतकऱ्यांना किती विमा परतावा मिळणार आहे. याची माहिती कृषी विभागाकडे दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५७ मंडलांपैकी १० मंडले पीकविमा परताव्याकरिता अपात्र ठरली आहेत. उर्वरित ४७ मंडलांतील ४१ हजार ३५० शेतकऱ्यांना ६७ हजार ९४ लाख ३ हजार ४८० रुपये इतका विमा परतावा मिळणार आहे.

अपात्र ठरलेली मंडले पुढीलप्रमाणे...

जिल्ह्यातील आंबेरी हे मंडल आंबा आणि काजूकरिता अपात्र ठरले आहे. तर वालावल, आजगाव, बांदा, माडखोल, निरवडे, सावंतवाडी, वेतोरे, वेंगुर्ला या मंडलांतील शेतकऱ्यांना देखील पीकविमा परतावा मिळणार नाही. आंबा पिकाकरिता हेक्टरी सर्वाधिक ७१ हजार ५००, तर सर्वांत कमी ७ हजार रुपये मंजूर आहेत. तर काजू पिकांकरिता हेक्टरी सर्वाधिक ६१ हजार, तर सर्वांत कमी १३ हजार हेक्टरी मिळणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com