Weather Agrowon
हवामान

Weather Update : राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे का? कोणत्या भागात गारपीटीची शक्यता?

Dhananjay Sanap

Weather Update : काल खान्देश, मराठवाडा व विदर्भात झालेल्या वीजा गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन अवकाळीचे वातावरण महाराष्ट्रात अजूनही २ मार्चपर्यंत टिकूनच आहे. वारा खंडितता व इतर प्रणालीमुळे हा पाऊस अजूनही होत आहे. सध्या पूर्वीचाच मार्गस्थ होत असलेल्या प. झंजावात पास होतो ना होतो तोच गुरुवार दि.२९ फेब्रुवारीला पुन्हा एक प.झंजावात प्रवेशण्याची शक्यता  हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या प. कि. पट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूर पर्यन्त पसरलेल्या समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या  हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस ह्या दोघांच्या एकत्रित परिणामतून संपूर्ण उ. भारतात, शनिवार दि.२ मार्चपर्यंत( विशेषतः १ व २ मार्चला अधिक) जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फबारी व काही भागात गारपीट होण्याची शक्यता वाढल्याचेही खुळे म्हणाले.

सध्या मार्गस्थ होत असलेल्या प. झंजावाताबरोबरच गुरुवार दि.२९ फेब्रुवारीला पुन्हा एक येणाऱ्या प.झंजावातामुळे जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फबारी होण्याची शक्यते बरोबरच,  महाराष्ट्रातही, कर्नाटकतील चिकमंगलूर ते महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी पर्यन्त समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या  हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळे मुंबईसह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रातही  वीजा, वाऱ्यांसाह अवकाळी पावसाची शक्यता अजुन ४ दिवस वाढली असुन ती शनिवार दि.२ मार्च पर्यन्त  टिकून राहण्याचा अंदाज खुळे यांनी दिला आहे. 

थंडीतील चढ उतारही ह्या प. झंजावातामुळे तसेच निम्न पातळीतील दोन प्रणल्यांच्या संगमातून जाणवत आहे. काल मंगळवार  दि.२७ फेब्रुवारी लाही मराठवाडा, विदर्भ व खान्देशात अवकाळी पावसाबरोबर तुरळक ठिकाणी झालेली गारपीटही प्रणालीच्या तीव्रतेमुळे झाली. खरे तर अवकाळी व गारपीटीची शक्यता विदर्भ, मराठवाडा व खान्देशात दि.२५ ते २७ फेब्रुवारी असे ३ दिवसच मर्यादित होती.

परंतु अरबी समुद्रातून पश्चिम राजस्थानात आर्द्रता ओतल्या जाणाऱ्या प्रणालीमुळे तसेच निम्न पातळीतील दोन प्रणल्यांच्या संगमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचा पावसाचा कालावधी ४ दिवसांनी म्हणजे २ मार्चपर्यन्त वाढलेला जाणवतो. परंतु दरम्याच्या काळात गारपीटीची शक्यता मात्र  केवळ नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर तसेच  मराठवाड्यातील ८ अश्या एकूण ५+८ अश्या १३ जिल्ह्यात  व लगतच्या परिसरात दि. २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यन्त असे ३ दिवस असा अंदाज खुळे यांनी वर्तवली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात २ मार्चपर्यंत तुरळक ठिकाणीच किरकोळ अवकाळी पावसाची तर नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर तसेच  मराठवाड्यातील ८ अश्या एकूण ५+८ अश्या १३ जिल्ह्यात  व लगतच्या परिसरात दि. २८ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यन्त असे ३ दिवस गारपीटीचा इशाराही खुळे यांनी दिलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT