Red Chili Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chili Market : लाल मिरचीला दराचा ठसका

देशात यंदा मिरची उत्पादन घटले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर तुडतुड्यामुळे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Pune News देशात यंदा मिरची उत्पादन (Chili Production) घटले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर (Chili Pest) तुडतुड्यामुळे मोठे नुकसान झाले.

उत्पादकता जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. दुसरीकडे मिरचीला मागणी आहे. त्यामुळे सध्या मिरचीचे दर (Chili Rate) तेजीत आहेत.

यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारातील आवक वाढल्यानंतरही दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.

देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यामुळे यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. पण यंदा उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंतच स्थिरावल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक भागांतील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांपर्यंत माल विकला आहे.

देशाती गेल्या हंगामातही मिरची उत्पादन घटले होते. त्यामुळे सध्या गोदामांमध्ये शिल्लक साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शिल्लक मिरचीचा साठा यंदा ९० टक्क्यांपर्यंत कमी आहे. यंदाही उत्पादन घटले. त्यामुळे सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत. शेतकऱ्यांनाही यंदा चांगला दर मिळत आहे.

पण उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फार नफा होताना दिसत नाही. मिरचीला सध्या चीन आणि बांगलादेशमधून मागणी आहे. सध्या नव्या मालाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे अनेक वाणांचे दर तेजीत आहेत. त्यामुळे अनेक आयातदार नवा माल बाजारात येण्याची वाट पाहत आहेत.

तेलंगणात दरात तेजी

देशात तेलंगणात सर्वाधिक ४ लाख हेक्टरवर मिरची लागवड झाली. देशातील एकूण क्षेत्रापैकी २२ टक्के तेलंगणात आहे. तर ३८ टक्के उत्पादन होते. यंदा तेलंगणात ७.२० लाख टन मिरची उत्पादन झाले.

पण तेलंगणातच दर तेजीत आहेत. तेलंगणातील बाजारात तेजी वाणाच्या मिरचीला सरासरी १८ हजार ते २३ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्या हंगामात हाच भाव १७ हजार रुपयांच्या दरम्यान होता. वंडर हॉट वाणाचे दर सध्या ३८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले.

गेल्या हंगामात हाच भाव २९ हजार रुपये होता. तर यूएस ३४१ वाणाने २६ हजारांचा टप्पा गाठला. मागील हंगामात हाच भाव २१ हजार रुपये होता. पुढील काळात बाजारात मिरचीची आवक वाढेल. पण दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.

यंदा तेलंगणात उत्पादन घटले. राज्यातही उत्पादन काहीसे कमी आहे. सध्या गेल्या वर्षीचा साठा खूपच कमी आहे. त्यातच मिरचीला चांगाल उठाव मिळतोय. त्यामुळे मिरचीला चांगाल दर आहे. पुढे आवक वाढली तरी मिरची दरातील तेजी कायम राहू शकते.

- सचिन जैन, मिरची व्यापारी, नंदूरबार

गेल्या हंगामात मिरचीला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे यंदा लागवड कमी झाली. त्यातच पाऊस आणि तुडतुड्यांमुळे उत्पादन घटले. उतारा गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास निम्माच आला.

- राहुल माळी, शेतकरी, शहादा, नंदूरबार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT