Jalgaon News: खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र सतत कमी होत आहे. कधी पावसाचा खंड, तर कधी अतिपावसाच्या फटक्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून उडीद, मूग पिके हातची जात आहेत. २०२२-२३ मध्ये दुष्काळाच्या फटक्याने, तसेच त्यापूर्वीची तीन वर्षे (२०१९-२०,२०-२१,२१-२२) आणि मागील वर्षी (२०२४-२५) अतिवृष्टीमुळे ही दोन्ही पिके हातची गेली. .सोयाबीन, मक्याकडे कल : खानदेशात काळ्या कसदार जमिनीत उडीद, मूग पिकाऐवजी सोयाबीन व मका पिकाची लागवड वाढत आहे. यंदाही अनेकांनी या पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. मका पिकात तूर, सोयाबीनमध्ये तूर असे प्रयोगही उडीद व मूग पेरणीऐवजी शेतकऱ्यांनी केले आहेत. यामुळे पेरा घटला. दुसरीकडे मका व सोयाबीनचा पेरा वाढला, अशी माहिती मिळाली..Moong Udid Sowing: खरीप मूग, उडीद, ज्वारीचा पेरा जेमतेम.परिणामी गेल्या चार वर्षांत उडदाचे एकरी दीड क्विंटल उत्पादनदेखील अनेक शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाही. प्रतिकूल वातावरणामुळे उडीद व मुगाचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे पूर्वी जळगावात उडीद, मुगाचे एकूण क्षेत्र ४५ ते ५० हजार हेक्टरपर्यंत असायचे. आजघडीला या दोन्ही पिकांचे एकूण क्षेत्र ३० हजार हेक्टर एवढेदेखील राहिले नसल्याची स्थिती आहे..यातच उडदाचे एकरी दीड ते दोन क्विंटल व मुगाचे एकरी ६० ते ७० किलो व कमाल एक क्विंटल उत्पादन आल्याची स्थिती आहे. पाऊस वेळेत आल्याने उडीद, मुगाची पेरणी वेळेत झाली. पण मागील हंगामात अतिपावसात व २२-२०२३ मध्ये कमी पावसामुळे दोन्ही पिकांची मोठी हानी झाल्याने अनेकांनी पेरा टाळला. परिणामी यंदा उडीद व मुगाची पेरणी कमी झाली. .Udid Market : करमाळा बाजार समितील उडीद लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला; हमीभावाप्रमाणे खरेदी होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात मुगाची सुमारे १५ हजार हेक्टरवर, तर उडदाची १६,२०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. धुळे व नंदुरबारात मिळून उडदाची सुमारे आठ हजार हेक्टरवर, तर मुगाची सुमारे सहा हजार हेक्टरवर पेरणी झाली. २०२०-२१ मध्ये खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र ५५ हजार हेक्टरपर्यंत होते..एकट्या जळगाव जिल्ह्यात उडदाची सुमारे १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर मुगाचीदेखील सुमारे १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यापूर्वीही उडदाची पेरणी २० ते २१ हजार हेक्टरवर केली जात होती. पण नंतर पेरा सतत कमी होत गेला. .पावसाचा खंड,अतिपावसात नुकसानयंदा जुलैच्या अखेरीस व ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुमारे २२ ते २५ दिवस पावसाचा खंड होता. या कालावधीत मूग, उडीद पिकाची फूलगळ झाल्याने पिकावर परिणाम झाला. नंतर ऑगस्टच्या मध्यात पाऊस सुरू झाला. सततच्या पावसात उडीद, मूग ही पिके खराब झाली..गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही पिकांचे उत्पादन हाती येतानाच पाऊस ऑगस्टमध्ये धुमाकूळ घालतो. यामुळे कापणी व मळणीही होत नाही. त्याचा दर्जा घसरतो व खरेदीदारांकडून दर पाडले जातात. असाच अनुभव यंदाही शेतकऱ्यांना आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.