Jalgaon News: खानदेशात केळी लागवड रखडत सुरू आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने अनेक भागांत वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे लागवड करणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच काही उतिसंवर्धित रोपे पुरवठार कंपन्यांनी रोपांचा पुरवठा उशिराने होईल, असे म्हटले आहे. यामुळे केळी लगवडीस आणखी उशीर होईल, असे दिसत आहे. .केळी रोपांच्या दरात सतत वाढ झाली आहे. केळी दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा तोटा वाढला आहे. त्यात मोठ्या उभारीने शेतकऱ्यांनी आगाप कांदेबाग केळी लागवडीसाठी केळी रोपांची आगाऊ नोंदणी कंपन्यांकडे केली होती. पण संबंधित कंपन्यांनी केळी रोपांचा पुरवठा वेळेत होणार नाही, असे म्हटले आहे. यामुळे लागवड महिनाभर उशिराने करावी लागेल, असे दिसत आहे..Banana Farming : दर्जेदार घड निर्मितीसाठी केळीत रोग व्यवस्थापन महत्त्वाचे.आगाप लागवडीस विलंबसप्टेंबरमध्ये काही भागांत आगाप कांदेबाग केळी लागवड झाली. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, पाचोरा-भडगाव, जामनेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर या भागांत कांदेबाग केळीची लागवड अधिक असते. या केळी लागवडीसाठी कमाल शेतकरी केळीचे कंद उपयोगात आणतात. तर अलीकडे उतिसंवर्धित केळी रोपांनाही मागणी आहे..या रोपांची आगाऊ नोंदणी तीन ते चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी संबंधित पुरवठादार, वितरक यांच्याकडे अनामत रक्कम भरून केली आहे. तसेच दर्जेदार केळीचे वाण किंवा कंद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर असतो. त्यासाठी आंबेमोहोर, श्रीमंती, महालक्ष्मी, सातमासी व ग्रॅण्ड नैन या वाणांच्या कंदांना शेतकरी पसंती देतात..Banana Farming: बदलत्या वातावरणात आणि लागवडीनंतर केळीच्या बागेची देखभाल कशी करावी?.केळी कंद औरंगाबादमधील कन्नड, सोयगाव, जळगावमधील जामनेर, रावेर, यावल, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. हलक्या, मध्यम जमिनीत काळ्या कसदार क्षेत्रातील कंद लागवडीला शेतकरी पसंती देतात. तर काळ्या कसदार जमिनीत हलक्या, मध्यम जमिनीत कंद लागवडीला पसंती दिली जाते..पावसाने कंद काढणीत अडचणमध्यंतरी अनेक दिवस खानदेशात व लगत पाऊस सुरू होता. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांमध्ये पाणी साचले. वाफसा नाहीसा झाला आहे. यामुळे केळी बागांमधून कंद काढणे, त्यांची लागवड, वाहतूक यावर परिणाम झाला आहे. परिणामी केळी लागवडदेखील रखडली आहे. यंदा कांदेबाग केळीची जळगाव जिल्ह्यात सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी अपेक्षा आहे..जोरदार पावसामुळे जलसाठे मुबलक आहेत. यामुळे केळी लागवड वाढू शकते, असाही अंदाज आहे. कोरडे वातावरण राहिल्यास केळी लागवडीला पुढील काही दिवसांत वेग येईल. अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी क्षेत्र तयार केले आहे. त्यात सऱ्या पाडून ठेवल्या असून, तण वाढल्याने तणनाशकेदेखील फवारली आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.