Orange Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Export : बांगलादेशमधील संत्रा निर्यात थांबली; ‘रॉयल्टी’त मोठी वाढ

Orange Marker Update : संत्राफळांच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या ‘रॉयल्टी’च्या रकमेत मोठी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Amravati News : संत्राफळांच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या ‘रॉयल्टी’च्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी बांगलादेशमध्ये संत्राफळांची होणारी निर्यात थांबली आहे. व्यापाऱ्यांकडून इतर बाजारपेठांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांकडील संत्राफळांची खरेदी केल्यानंतर अनेक व्यापारी चांगला भाव मिळत असल्याने बांगलादेशला पाठविण्यास पसंती दर्शवीत होते. परंतु यावर्षी अचानकपणे २३०० रुपये प्रति कॅरेट ‘रॉयल्टी’चा दर ठरल्यामुळे एक हजार कॅरेटच्या एका गाडीसाठी रॉयल्टीची रक्कम २३ लाखांवर जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बांगलादेशच्या बाजारपेठेत संत्राफळ पाठविणे बंद केले आहे.

अशावेळी खरेदी केलेला संत्रा दक्षिण भारतातील बाजारपेठेत पाठविणे सुरू होते. परंतु त्या बाजारपेठेत सुद्धा संत्राफळांचा उठाव कमी झाला. त्यामुळे भाडेवाढ होत असल्याने तेथेसुद्धा व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अखेर त्यावर पर्यायी उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी काश्मीर व दिल्लीच्या बाजारपेठेत संत्राफळ पाठविणे सुरू केले आहे.

शेतकऱ्यांपासून ५०० रुपये प्रति कॅरेटप्रमाणे संत्राफळांची खरेदी केल्यानंतर त्यावर ठोक ५०० रुपये व इतर खर्च करून संबंधित बाजारपेठेमध्ये संत्रा पाठविले असता, त्याठिकाणी १५०० ते १६०० रुपये प्रतिकॅरेट प्रमाणेच भाव मिळत आहे. तेव्हा १२०० रुपयांपर्यंतचा खर्च वजा जाता विशेष नफा उरत नसल्याचे व्यापारी सांगतात.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने संत्राफळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे शेतात तयार झालेला संत्राफळांचा माल शेतकरी जास्त दिवस झाडावर ठेवू शकत नाहीत. भीतीपोटी त्यांच्याकडून या मालाची विक्री होत आहे. तर लहान आकाराचे फळांची तोडणी करताना व्यापारीसुद्धा सावध पवित्रा घेत आहे.

‘रॉयल्टी’ वाढीचे ग्रहण

मृगबहाराच्या तुलनेत आंबिया बहाराचे उत्पादन कमी येते. पर्यायी त्याला भावही कमी मिळतो. परंतु मागच्या वर्षी आंबिया बहाराच्या संत्राफळांना बाजारपेठेत मोठी मागणी होऊन भावसुद्धा चांगले मिळाले. मात्र यावर्षी बांगलादेशसारख्या मोठ्या बाजारपेठेत ‘रॉयल्टी’ वाढीचे ग्रहण लागल्याने या व्यवहारात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचाही पूर्णतः भ्रमनिरास झाला आहे.

‘रॉयल्टी’ कमी करावी

शासनाने ‘रॉयल्टी’ची रक्कम कमी करण्याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा पथ्रोट येथील संत्रा व्यापारी अन्सार अहमद शेख दिलावर यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Dam: उजनीतून ९० हजार क्युसेक विसर्ग

POS Device: खतविक्रीसाठी नवे पॉस मशिन बंधनकारक

Monsoon Rain Update: ताम्हिणी घाटात ‘रेकॉर्ड ब्रेक’ ५७५ मिमी पावसाची नोंद

Papaya Price: खानदेशात पपईचे दर १२ ते २० रुपये किलो

Farmer Support: शासन अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी :भरणे

SCROLL FOR NEXT