Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Production : डाळिंब उत्पादनामध्ये २० टक्के घट शक्य

Pomegranate Market : डाळिंबाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : देशात यंदाच्या मृग बहरातील डाळिंबाला अतिपावसाचा फटका बसल्याने सुमारे ३० टक्के बागांवर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, डाळिंबाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटण्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने डाळिंब बागेला पोषक वातावरण असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशात यंदाच्या मृग बहरात सुमारे ७५ हजार हेक्टर वर डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी साधल्या आहेत. मात्र बागा धरल्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. सद्यःस्थितीत ३० टक्के बागांवर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आहे. तेलकट रोगामुळे फळ खराब होते. त्यामुळे सुमारे २० टक्के उत्पादन कमी होईल असा अंदाज ही शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, देशभरातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात कमी अधिक पाऊस असल्यामुळे तेलकट रोग फारसा वाढला नाही. अनेक भागात डाळिंबाच्या बागा चांगल्या आहेत. सध्या डाळिंबाचे फळ २०० ग्रॅम वजनापर्यंत आहे. गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तसेच डाळिंब पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश पीक चांगले

कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत अपेक्षित पाऊस झाला आहे. रोगाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच पोषक वातावरणामुळे या दोन्ही राज्यांतील डाळिंबाची पीक स्थिती चांगली असल्याचे डाळिंब संघाने सांगितले आहे.

परतीच्या पावसावर अवलंबून

सध्या डाळिंबाची पीक स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही अंशी आनंदाचे वातावरण आहे. मात्र येत्या आठवड्याभरात पुन्हा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यातच परतीचा पाऊस सुरू होईल. यामुळे या पावसाचा डाळिंब पिकाला किती फटका बसू शकतो, याचा अंदाज आता सांगणे कठीण आहे.

राजस्थानमध्ये नुकसान वाढणार

राजस्थानमध्ये सुमारे १५ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र असून त्यापैकी १० हजार हेक्टरवर मृग बहर धरला आहे. मात्र या भागातही सततत्या पावसाचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा पाऊस झाल्याने राजस्थानमध्ये डाळिंबाचे नुकसान वाढणार आहे.

यंदाच्या मृग बहरातील डाळिंबाचे नुकसान गतवर्षीपेक्षा फारसे झालेली नाही. अशा परिस्थितीतही डाळिंबाची गुणवत्ता चांगली आहे. पुढच्या पावसावर इथून पुढची पीक परिस्थिती अवलंबून आहे.
प्रभाकर चांदणे, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Karjmafi : कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचां उद्रेक होईल; डॉ. अजित नवलेंचा सरकारला इशारा

Indian Politics: किसमें कितना है दम!

Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?

Parliament Monsoon Session : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात कॉँग्रेसचे सरकारला आठ प्रश्न

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

SCROLL FOR NEXT