Mango Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Mango Crop Management : आंबा बागेतील फळगळ, फळमाशीला कसं रोखाल?

Mango Fruit Drop : सध्या आंबा बागांमध्ये फुलोरा ते फळधारणा अवस्था चालू आहे. कोरडे हवामान, तापमानात होणारी वाढ आणि बाष्पीभवनात झालेली वाढ यामुळे आंब्याच्या झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. याशिवाय फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने दिलेला सल्ला काय आहे ते जाणून घेऊया.

Team Agrowon

Mango Fruit Fly : सध्या आंबा बागांमध्ये फुलोरा ते फळधारणा अवस्था चालू आहे. कोरडे हवामान, तापमानात होणारी वाढ आणि बाष्पीभवनात झालेली वाढ यामुळे आंब्याच्या झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. याशिवाय फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने दिलेला सल्ला काय आहे ते जाणून घेऊया.

आंब्याच्या वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांची गळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे.

झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.

आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशी कीडग्रस्त गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये खालील बाजूच्या फांद्यांवर लावावेत.

आंबा फळांची गळ कमी करण्यासाठी आणि फळांची प्रत सुधारण्यासाठी १ टक्का पोटॅशिअम नायट्रेटची (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात.

वाढणारे कमाल तापमान लक्षात घेता हापूस आंब्यातील फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर नॅप्थील ॲसेटिक ॲसिड २० पीपीएम (१ ग्रॅम प्रति ५० लिटर पाणी) या प्रमाणे मोहरावर फवारणी करावी. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर करावी. या वाढ नियंत्रकाचे द्रावण तयार करताना ते प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावे.

नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून एकदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून एकदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून एकदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी द्यावे.

फळमाशी आणि प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ × २० सें.मी. आकाराच्या कागदी पेपरपासून बनविलेल्या पिशव्यांचे अवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे फळांचा आकार व वजन वाढण्यासोबतच डाग विरहित फळे मिळतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT