Maharudra Mangnale Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Manganale: एक शेती शास्त्रज्ञ शेतावरच्या आमच्या घरी येतो तेव्हा...

डॉ. रविंद्र हे जळकोट तालुक्यातील विराळ या गावचे. त्यांच्या गावचा रस्ता शिरूर ताजबंदवरूनच जातो. परवा पुण्याला परत निघताना ते रुद्रा हट या आमच्या शेतातल्या घरी ते आले.

Maharudr Mangnale

Jalkot News : माती सुधारणा आणि पिकांचं रसायनशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवलेले अभ्यासक‌ व सल्लागार डॉ. रविंद्र बोटवे हे माझे फेसबुक मित्र, चाहते. ते पुण्याला असतात. फोनवर अधूनमधून आमचा संपर्क असतो. त्यांनी ' माय माती ' या नावाने मातीची सखोल चिकित्सा, चर्चा करणारं लेखन केलंय. सामान्य शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी हे लिहिलंय. हे लेखन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्याचं पुस्तक मुक्तरंग प्रकाशनामार्फत काढण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.

डॉ. रविंद्र हे जळकोट तालुक्यातील विराळ या गावचे. त्यांच्या गावचा रस्ता शिरूर ताजबंदवरूनच जातो. परवा पुण्याला परत निघताना ते रुद्रा हट या आमच्या शेतातल्या घरी ते आले. सोबत त्यांचे बंधू राजू बोटवे हेही होते. दुपारी भर उन्हात आमची शेती दाखवली. प्रत्येक वावरातील माती बघून त्यांनी त्यांचं प्राथमिक मत व्यक्त केलं. शेततळं, विहीर व बागही दाखवली. यासंदर्भात त्यांच्याशी झालेली चर्चा उपयुक्त होती.

मुळात शेतीसंबंधी मी जी भूमिका मांडतोय, त्याची पुष्टी करणारीच त्यांची मतं आहेत. शेतकऱ्याला स्वत:च्या शेतीसंबंधी जेवढं कळतं तेवढं इतर कोणालाही कळत नाही. मात्र शेतकरी स्वत:च्या डोक्याचा वापर करीत नाही, हे माझं मत डॉ.बोटवे यांनी मान्य केलं. एकूणच शेती, बि-बियाणे, खतं, किटकनाशके, तणनाशके याचं अफाट मार्केटिंग, त्याचं वास्तव, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आदी बाबींवर आम्ही विस्ताराने बोललो.

मी डॉ. रविंद्र यांना म्हटलं, उत्पादन कसं वाढवायचं ते मला सांगू नका...ते सांगणं म्हणजे पुन्हा अमूक खतं वापरा..हे डोस द्या...हे फवारा..असं सांगणं आलं. मला कमीत कमी खर्चात शेती कशी करायची, याबद्दल काही सांगता आलं तर सांगा. मी सध्या फक्त त्याचाच विचार करतोय.

आम्ही खूप मोलाचं बोललो.शेतीला आणखी वाईट दिवस येणार असल्याचं मत मी साधार मांडलं. शेतीत उत्पन्न वाढण्याची खात्री नसेल तर किमान खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, हे माझं म्हणणं त्यांना पटलं.

खरं तर , शेतीच्या शोषणावरचं ही अजस्त्र बांडगुळी व्यवस्था जगते,हे आम्हा दोघांनाही माहिती आहे. डॉ. रवींद्र यांनी शेतीच्या शोषणाचे त्यांचे विविध अनुभव सांगितले. या साखळीत एखादा- दुसरा प्रामाणिक माणूस काहीही करू शकत नाही, हेही सांगितलं.

डॉ. रविंद्र हे शास्त्रज्ञ असूनही, इथल्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं, ही त्यांची तळमळ आहे. ते त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. ते शास्त्रज्ञ आहेत, तर मी साधा शेतकरी. मी ना अभ्यासक आहे ना संशोधक.

मी शेतीत जे अनुभवतो तेच लिहितो. तरीही त्यांना माझं लेखन मोलाचं वाटतं, हे मला आश्वस्त करणारं आहे. आम्ही छान चर्चा केली. गप्पा मारल्या. सरबत आणि लस्सीने त्यांचा पाहुणचार केला. एकंदरीत ही भेट दोघांसाठीही आनंददायी ठरली.

राजू हा त्यांचा भाऊ गावाकडं शेती करतो. तो बंडखोर आहे. त्याला वाचायची आवड आहे. त्याच्याशीही शेतीसंदर्भात छान चर्चा झाली. त्याचा शेतीचा चांगला अभ्यास असल्याचं माझ्या लक्षात आलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT