Water Agrowon
ॲग्रो विशेष

Water Recovery : पाणीपट्टी वसुलीसाठी ‘मजीप्रा’चा पुरवठा खंडीत करण्याचा इशारा

Maharashtra Jeevan Pradhikaran : जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजीप्रा) अदा करायच्या रकमेचा डोंगर तयार झाला असून याबाबत तोडगा न काढल्यास १६ फेब्रुवारीपासून या योजनेचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व अकोला तालुक्यांत कार्यरत असलेल्या ९६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या खर्चापोटी जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (मजीप्रा) अदा करायच्या रकमेचा डोंगर तयार झाला असून याबाबत तोडगा न काढल्यास १६ फेब्रुवारीपासून या योजनेचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुमारे १३ कोटी ६९ लाख रुपयांची ही थकबाकी असून पाणीपुरवठा बंद झाल्यास खारपाण पट्ट्यातील सुमारे ९६ गावांना टंचाईच्या झळा बसू शकतात. ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीतील जलवाहिन्यांना येणारा खर्च स्वतः करावा असेही आता प्राधिकरणाने कळवले आहे.

तेल्हारा तालुक्यात असेल्या वान प्रकल्पावरून खारपाण पट्ट्यातील ८४ गावांना पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये अकोट तालुक्यातील ७४ गावे व तेल्हारा तालुक्यातील ११ गावांचा समावेश होता. नंतर अकोला तालुक्यातील ९ गावांचाही समावेश वाढवण्यात आला. यामुळे ही योजना ९४ गाव पाणीपुरवठा योजना झाली.

या गावातील योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने दरमहा १५ लाख २५ लाख रुपये अदा करण्याचे शासनस्तरावर ठरवण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसूल करून जिल्हा परिषदेकडे देणे व जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुपूर्द करणे अशी ही व्यवस्था होती.

यानुसार जिल्हा परिषदेने २०१२-१३ ते २०२३-२४ पर्यंत २१ कोटी ९६ लाख रुपयांचा भरणा करणे गरजेचे होते. परंतु या कालावधीत ८ कोटी २६ लाख रुपयेच दिले गेले. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला १३ कोटी ६९ लाख रुपये घेणे आहेत. ही रक्कम वेळेत अदा करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २७ डिसेंबर २०२३ रोजी अकोट येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांच्या उपस्थितीत बैठकही झाली.

यामध्ये पाणीपट्टी वसुलीबाबत सूचना करण्यात आली. मात्र, त्यानंतरही हा विषय गांभिर्याने न घेतल्याने पाणी पट्टी भरणा थकलेला आहे. परिणामी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १५ फेब्रुवारीची डेडलाइन देत त्यानंतर पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला. या गावांना गोड्या पाण्याचा दुसरा स्त्रोत नसल्याने आता आपत्ती ओढवण्याची शक्यता वाढली आहे. आधीच यावर्षी कमी पावसामुळे येत्या उन्हाळ्यात टंचाईच्या झळा वाढू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT