Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ७४९ लघू व ७५ मध्यम प्रकल्प मिळून ८२४ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा अनुक्रमे आठ ते सात टक्क्यांवर आला आहे. १३४ लघू मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, ३२६ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांमध्ये केवळ १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने टंचाईची चिंता वाढली आहे.

मराठवाड्यातील मोठ्या ११, मध्यम ७५, लघू ७४९, गोदावरी नदीवरील १५ बंधारे तसेच तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधारे मिळून ८७७ प्रकल्पात केवळ १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये मध्यम ७५ प्रकल्पात सात टक्के, तर लघू ७४९ प्रकल्पात ८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये १९ टक्के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यात २१ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील बंधाऱ्यात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. आणखी मे आणि जून हे दोन महिने पूर्ण जाऊन त्यानंतर पाऊस कधी येतो त्यावर सारं काही अवलंबून असणार आहे. आताच्या घडीला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिवमध्ये पाणीटंचाई रौद्ररूप धारण करण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे.

मध्यम प्रकल्प

कोरड्या पडलेल्या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये बीड मधील तीन धाराशिव व जालन्यातील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. २६ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ११ प्रकल्प धाराशिवमधील, तर लातूरमधील तीन, बीडमधील पाच, जालन्यातील चार तसेच नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

लघू प्रकल्प

कोरड्या पडलेल्या १२९ लघू प्रकल्पात सर्वाधिक ६२ प्रकल्प धाराशिवमधील असून, लातूरमधील ११, बीड मधील ४४, तर छत्रपती संभाजीनगरमधील १२ लघू प्रकल्पाचाही यामध्ये समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या ३०० लघू प्रकल्पात सर्वाधिक ८९ प्रकल्प धाराशिवमधील आहेत. लातूरमधील ७३, बीडमधील ४७, छत्रपती संभाजीनगर मधील ३१, जालन्यातील १४, नांदेड व परभणीतील प्रत्येकी १८, तर हिंगोलीतील १० लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

सीनाकोळेगाव, माजलगावमध्ये नाही उपयुक्त पाण्याचा थेंब...

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव व सीना कोळेगाव या दोन प्रकल्पांत उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ११ टक्क्यांवर आला आहे. निम्न दुधना प्रकल्पात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक असून निम्न तेरणा प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा तळाला गेला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ३४ टक्के, निम्न मनारमध्ये २८ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ४२ टक्के, सिद्धेश्‍वरमध्ये २४ टक्के, येलदरीत ३० टक्के, मांजरामध्ये ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT