Agricultural Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Crisis : पावसामुळे पिकांवर संकटाचे ढग; शेतकऱ्यांसमोर नवी आव्हाने

Climate Change Impact : गेले काही दिवस सुरू असलेला थंडीचा जोर कमी होऊन शुक्रवारी (ता. २७) पहाटेपासून या भागात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी दिली.

Team Agrowon

Akola News : गेले काही दिवस सुरू असलेला थंडीचा जोर कमी होऊन शुक्रवारी (ता. २७) पहाटेपासून या भागात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी दिली. हा पाऊस सध्या तूर आणि हरभरा या दोन पिकांना सर्वाधिक मारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे या पिकांचे अधिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

पश्‍चिम विदर्भात शुक्रवारी (ता. २७) पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. हवामान खात्याने या भागात दोन दिवस अवकाळी पावसाचा, गारपिटीचा आधीच इशारा दिलेला आहे. त्यानुसार पाऊस दाखल झाला. सध्या खरिपातील तुरीचे पीक कोरडवाहू पट्ट्यात फुलोरासह शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे.

तर रब्बीतील हरभऱ्यातही फुलोरावस्था, घाटे धरण्याची स्थिती सुरू झालेली आहे. या वर्षी आधीच तुरीच्या पिकावर मध्यंतरीच्या धुक्यामुळे बराच काळ कीड-रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने ही कीड-रोगावस्था नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आता पाऊस आल्याने पुन्हा तुरीचे पीक बहुतांश भागात अडचणीत सापडू शकते. हरभऱ्याचेही असेच नुकसान होण्याची चिन्हे आहेत.

पाऊस, ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यात अळीचा प्रादुर्भाव अधिक तयार होऊ शकतो. कोरडवाहू पट्ट्यात कापूस हंगाम सुरू आहे. अकोल्यात खारपाण पट्ट्यात अनेक ठिकाणी वेचणीला आलेला कापूस या पावसात भिजल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कापूस खराब होऊ शकतो. सध्या पश्‍चिम विदर्भात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर तुरीचे पिक उभे आहे. तर हरभरासुद्धा सुमारे चार लाख हेक्टरपर्यंत पेरणी झालेला आहे. या दोन्ही प्रमुख पिकांसह थोडे नुकसान गव्हालाही होण्याची शक्यता वाढली आहे.

हरभरा पीक फुलाच्या अवस्थेत आहे. या पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकाचे खूप मोठे नुकसान होणार आहे. कारण आता पाऊस व धुके पडले तर फुलगळ होऊ शकते. यामुळे उत्पन्नात घटीची शक्यता नाकारता येत नाही.
विनोद पाटील, शेतकरी, सुदी, जि. वाशीम
हरभऱ्याचे पीक सध्या फुलोऱ्यात आहे. धुक्यामुळे फुले जळू शकतात. तुरीचे पीकही हिरवेगार असून होरपळण्याची भीती आहे. काढणीस आलेली तूर खराब होऊ शकते. भाजीपाला पिकांचे नुकसान दिसत आहे. कांद्यालाही हे वातावरण बाधक आहे. शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे.
डॉ. गजानन गिऱ्हे, शेतकरी, देऊळगाव माळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT