Agricultural Crisis : पाणी आणि विजेची टंचाई कायम; शेतकऱ्यांची चिंता वाढली!

Farmer Issue : खानदेशात शिवारात व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नाही. शेतीपंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरूस्त होत आहेत. नवे शासन अस्तित्वात आले आहे.
Electricity Issue
Electricity IssueAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात शिवारात व ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत नाही. शेतीपंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, पंप नादुरूस्त होत आहेत. नवे शासन अस्तित्वात आले आहे. मोफत विजेची घोषणा शासनाने पाच व साडेसात अश्‍वशक्तीच्या पंपांसाठी केली. पण वीज सुरळीत व व्यवस्थित मिळावी, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही ही समस्या शिवारात होती. पण त्या वेळेस शिवारात विजेची मागणी कमी होती. आता रब्बी हंगाम सुरू आहे. केळी, कलिंगड, पपई, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, कांदा व अन्य पिकांत पाण्याची मोठी गरज आहे. विद्राव्य खते देण्यासाठी कृषिपंप दोन-तीन दिवसाआड शेतकरी सुरू करीत आहेत. परंतु वीजपुरवठा व्यवस्थित नाही.

Electricity Issue
Electricity Bills : वीजबिलात १६ टक्के शुल्काचा भुर्दंड

शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्याची तरतूद आहे; परंतु निर्धारित वेळेत सुरळीत वीजपुरवठा अनेक भागांत होत नाही. शेतीला दिवसा फक्त साडेपाच ते सहा तास वीज मिळत आहे. दिवसा वीज मिळत नाही. वीज वितरण कंपनी मात्र खंडित वीजपुरवठ्याबाबत मौन बाळगून आहे. कुठलीही सकारात्मक कार्यवाही याबाबत केली जात नाही. खते ड्रीपमधून देण्यासाठी शेतीपंप सर्वत्र सुरू केले जातात. पण वीजपुरवठ्याची समस्यादेखील समोर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धुळे, जळगाव व नंदुरबारातील सर्वच भागांत शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा केला जात असून, ग्रामस्थ व शेतकरी वैतागले आहेत. विजेच्या लपंडावामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, जळगाव, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, साक्री, धुळे आदी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असतो.

Electricity Issue
Marathwada Water Storage : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर

रब्बी हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने विहिरी, कूपनलिकांमधून पिकांना पाणी देण्यात येईल. सर्वच कृषिपंप सुरू होतील. अनियमित वीजपुरवठा, वारंवार बदलणारा विजेचा दाब यामुळे शेतीपंप खराब होत होण्याची समस्याही असणार आहे. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसत आहे.

रोहित्रे दुरुस्त होतील केव्हा

वीजपुरवठा यंत्रणेत अनेक रोहित्रे नादुरुस्त, तर काही कायमस्वरूपी बंद असल्याचे दिसत आहे. वीजतारांची अवस्थाही भीषण आहे. शिवारात तारा लोंबकळल्या असून, काही ठिकाणी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र त्यांच्या दुरुस्तीची तसदी वीज कंपनी घेत नाही. परिणामी अनेकदा तक्रार करूनही कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी आहेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com