Shivraj Singh Chouhan Agrowon
ॲग्रो विशेष

Shivraj Singh Chouhan : परळी कृषी महोत्सवातून शिवराज सिंह यांची विरोधकांवर टीका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्धाटना वेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर टीका केली. शिवराज यांनी, काँग्रेसवाले तर म्हणत होते पैसे खटाखट देऊ पण दिलं काहीच नाही. पण सध्या राज्यातील महायुती सरकारने एका पेक्षा अनेक चांगल्या योजना राज्यात राबवल्या. देशाच्या समोर एक उदाहरण ठेवल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

परळी येथे बुधवारी (ता.२१) कृषी महोत्सवाचे उद्घाटन कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे, खा. सुनील तटकरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.पंकजा मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाच्या अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शिवराज चौहान म्हणाले, धनंजय मुंडे यांनी बोलवले म्हणून आलो. तर गोपीनाथ मुंडे यांच्याकडून खूपकाही शिकण्यास मिळाले. राज्यात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे ब्रम्हा, विष्णू आणि महेशाच्या जोडी प्रमाणे असून त्यांनी राज्याला पुढे नेणाऱ्या योजना सुरू केल्या. देशाच्या समोर महाराष्ट्राने एक उदाहरण ठेवल्याचा दावा शिवराज चौहान यांनी केला.

यापूर्वी काँग्रेसने सांगितले होते की, आम्ही खटाखट बटन दाबून योजना आणू पैसे वाटू. पण राज्याला त्यांनी काहीच दिले नाही. पैसे दिले ते महायुती सरकारने. राज्यातील महिलांना एका वेळी ३ हजार देऊन त्यांचे आर्थिक सक्षमिकरण करणारी लाडकी बहीण योजना नाही तर ती महिलांची घरातच सन्मान वाढवणारी आहे. हेच काम शिंदे यांनी केल्याचे शिवराज चौहान म्हणाले.

देशातील एकमेव राज्य महाराष्ट्र असून येथे फक्त १ रूपयात पीक विमा योजना आहे. पण काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्यांचे एक एक पैसा दिला जाईल, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी न्याय केला जाईल, असा शब्द देत असल्याचे शिवराज चौहान म्हणाले. राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार एकच असून एकत्र बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोयाबीनचा हमीभाव आहे ४ हजार ८९२ रुपये दिले जात आहेत. कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी ५ हजार अनुदान देण्याची योजना देशातील पहिली आणि एकमेव आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करत असल्याचे शिवराज चौहान म्हणाले.

तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहा कलमी धोरण आखल्याचे शिवराज यांनी सांगितले. यात उत्पादन वाढवणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादनाला रास्त भाव देणे, नैसर्गिक आपत्तींमध्ये योग्य प्रमाणात दिलासा देणे, शेतीचे विविधीकरण आणि नैसर्गिक शेतीला चालना देणे असल्याचे शिवराज म्हणाले. यावेळी राज्यातील कांदा, सोयाबून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. कापूस, सोयाबीन आणि कांद्याला चांगले भाव देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन शिवराज चौहान यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT