Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बीसाठी दोन लाख १० हजार टन खते मंजूर

Rabi Fertilizers : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडून दोन लाख १० हजार टन खते मंजूर करण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडून दोन लाख १० हजार टन खते मंजूर करण्यात आली आहे. या खतांचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा जिल्ह्यात खरिपात शेतकऱ्यांसाठी दोन हजार ४३ कोटी ४३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी २ हजार २६२ कोटी ७६ लाख ५६ हजार रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. त्यातच चांगला पाऊस पडल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. पश्चिम पट्ट्यात पुरेसा पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत.

पूर्व पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने काही प्रमाणात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना चांगला जाण्याची शक्यता आहे. परंतु आर्थिक अडचणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यासाठी पीडीसीसी बॅंकेने ६८१ कोटी २३ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे.

रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी क्षेत्रात काही प्रमाणात वाढणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी खरिपात झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी ज्वारीच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ८० हजार ५९५ हेक्टरवर पेरणी होण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. यात ज्वारीची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. रब्बी ज्वारीपाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

पॉस मशीनवर नोंदणी केल्याशिवाय शेतकऱ्यांना खते मिळणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

महिनानिहाय मंजूर केलेली खते (टनामध्ये)

महिना मागणी केलेली खते

ऑक्टोबर २४,९५३

नोव्हेबर ३२,०६२

डिसेंबर ४५,४३२

जानेवारी ४२,८८७

फेब्रुवारी ३१,६०६

मार्च ३३,७६०

खरिपात चांगल्या झालेल्या पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. दर महिन्याला शेतकऱ्यांना खते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे फार अडचण येणार नाही, काही अडचणी आल्यास संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना खते उपलब्ध करून दिली जातील.
संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT