Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar Protest : तुपकरांचे ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजात बेमुदत अन्नत्याग

Farmer Issues : सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाउंड यांसह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ३ सप्टेंबरपर्यंत ठोस निर्णय घेतले घ्यावेत.

Team Agrowon

Buldhana News : सोयाबीन-कापूसप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीला मजबूत कंपाउंड यांसह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात सरकारने ३ सप्टेंबरपर्यंत ठोस निर्णय घेतले घ्यावेत.

अन्यथा, ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनास करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

‘‘सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलने करीत आहोत, पण सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार आमचा शेवटचा अल्टिमेटम आहे.

जर सरकारने ठोस निर्णय घेतले नाहीत, तर ४ सप्टेंबरपासून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील,’’ असा इशारा तुपकरांनी दिला आहे.

शनिवारी (३१ ऑगस्ट) तुपकर यांनी भूमिका जाहीर केली. या वेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले, विनायक सरनाईक, सदाशिव जाधव, अनिल पडोळ, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे, राम अंभोरे, अविनाश डुकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT