Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : यंदा सहा टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

Sowing Update : खानदेशात यंदा सुमारे सहा टक्के क्षेत्र नापेर राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा सुमारे सहा टक्के क्षेत्र नापेर राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवले असून, त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे.

खानदेशात काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा कमी होतो. पीक फेरपालट करणे अनेकदा शक्य नसते. तसेच शेणखत व अन्य सेंद्रिय बाबींचा उपयोग होत नसल्याने जमीन सुपीकता टिकविण्यासंबंधी अडचणी येतात. या स्थितीत अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. नापेर क्षेत्र यंदाही अनेक भागांत आहे. तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रात नापेर क्षेत्र आहे. या क्षेत्रात उन्हाळ्यात पूर्वमशागत करण्यात आली. अनेकांनी केळीसाठी खोल नांगरणी केली व शेत भुसभुशीत करून त्यात पेरणी टाळली आहे.

जळगाव तालुक्यासह अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागातही अनेकांनी क्षेत्र भुसभुशीत करून घेतले. हे क्षेत्र तापल्यास त्यातील बुरशीजन्य समस्या, शत्रू किडींची समस्या दूर होते, असे शेतकरी मानतात. तसेच जमीन सुपीकतेला मदत होते.

नापेर क्षेत्रात कोरडवाहू रब्बी पिके जोमात येतात. कमी खर्च लागतो, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे यंदाही नापेर क्षेत्राचा प्रघात अनेक शेतकऱ्यांनी कायम ठेवला आहे. खानदेशात १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिके असतात. यंदा पेरणीची टक्केवारी चांगली आहे. मागील हंगामात जूनमध्ये पाऊस कमी होता. जुलैत पाऊसमान बरे होते. पावसाची तूट मात्र दोन्ही महिन्यांत मागील वेळेस होती.

यंदा मात्र चांगला पाऊस आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस जून व जुलैत झाला आहे. एकूण पावसाच्या तुलनेत सर्वत्र ४० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. पावसाचे आणखी ६८ दिवस अधिक़ृतपणे राहिले आहेत. परंतु आतापर्यंत चांगले पाऊसमान असून, अशीच स्थिती राहिल्यास सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस खानदेशात होईल, अशी स्थिती आहे.

यामुळे पेरणीही या महिन्यात खानदेशात ९२ टक्क्यांवर गेली आहे. आणखी बाजरी व अन्य पिकांची पेरणी होईल. परंतु कापूस, उडीद, तूर, सोयाबीन, तीळ व अन्य खरीप पिकांची पेरणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे खानदेशात यंदा ९४ टक्के एकूण पेरणी होईल, अशी स्थिती आहे.

नापेर क्षेत्रात सप्टेंबरमध्ये पूर्वमशागत करून ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच केळी, रब्बी पिकांची पेरणी होईल. या क्षेत्रातील पिके जोमात वाढतात व वेळेत पेरणी होत असल्याने पुढे वेळेत काढणी, मळणी होते. सुरुवातीच्या दरांचा लाभही मिळविता येतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Agri Exhibition: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन नऊ जानेवारीपासून

Mango Season: हापूस यंदा एकाच टप्प्यात

Pomegranate Export: डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देणार : पणनमंत्री रावल

Maize Production: रब्बीत मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

SCROLL FOR NEXT