Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election 2024 : शिर्डीतल्या तिरंगी लढतीकडे लागले राज्याचे लक्ष

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नेत्यांचे मतदार संघ असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात ऐनवेळी वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांच्या एन्ट्रीने महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री शंकरराव गडाख अशा मातब्बर नेत्यांचे मतदार संघ आहेत.

नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. त्याआधी काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे खासदार होते. या लोकसभा मतदार संघात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहाता, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर, माजीमंत्री मधुकर पिचड यांचा अकोले, आमदार अशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा कोपरगाव मतदारसंघ, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघ व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासा विधानसभा मतदारसंघ शिर्डीत येतो.

सध्या शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात, लहू कानडे महाविकास आघाडीसोबत तर राधाकृष्ण विखे पाटील, अकोल्याचे आमदार किरण लहामटे, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, कोपरगावचे आमदार अशुतोष काळे, श्रीरामपूरमध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंगे महायुतीसोबत आहेत.

लोखंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने महायुतीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. सुरुवातीला दुरंगी वाटणारी शिर्डीची निवडणूक वंचितच्या एन्ट्रीने तिरंगी होत आहे. माजी मंत्री कै. दादासाहेब रूपवते व कै.मधुकरराव चौधरी या दिग्गज काँग्रेस नेत्यांचा कौटुंबिक वारसा असलेल्या उत्कृर्षा रूपवते यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. रूपवते पूर्ण ताकदीने स्पर्धेत उतरल्याने तिरंगी लढत होत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रश्न

श्रीरामपूर व अन्य भागांत औद्योगिक वसाहत वाढीचा तेथील पाणी व विजेचा प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष.

सर्वाधिक सहकारी साखर कारखाने या भागात असून ऊस दराचा प्रश्न कायम.

राहाता, संगमनेरमधील दुष्काळी पट्ट्यातील विविध प्रलंबित प्रश्न.

संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव भागात टोमॅटो, पेरूचे मोठे उत्पादन, मात्र या भागात प्रक्रिया उद्योग उभारणीकडे दुर्लक्ष. त्यावर कोणीच बोलत नाही.

नदीवरील बंधारे, निळवंडेचा रखडलेला प्रश्न अजून पूर्ण क्षमतेने सुटला नाही. गोदावरीला सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर नेते गप्प.

गोदावरी, मुळा, प्रवरासह अनेय नदीकाठच्या जमीनी क्षारपाड झाल्यात. त्यावर उपाययोजना करण्याबाबत कधीही बोलले जात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT