Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : ऊस तोडणीला गती; नंदुरबारमध्ये सर्वाधिक गाळप

Sugarcane Season : खानदेशात दिवाळी सणानंतर ऊस तोडणी काहीशी उशिरा सुरू झाली. त्यात मागील महिन्याच्या अखेरीस पावसाने ऊस तोडणीला फटका बसला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दिवाळी सणानंतर ऊस तोडणी काहीशी उशिरा सुरू झाली. त्यात मागील महिन्याच्या अखेरीस पावसाने ऊस तोडणीला फटका बसला. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून ऊस तोडणीला गती आल्याची स्थिती आहे. सर्वाधिक गाळप नंदुरबारमधील कारखान्यांनी केले आहे.

ऑक्टोबरमध्ये ऊस तोडणी सुरू होणे अपेक्षित होते. पण त्या वेळेसही पाऊस सुरू होता. शेतकरी अडचणीत आला. अशातच ऊस तोडणी काहीशी उशिरा किंवा नोव्हेंबरअखेरीस सुरू झाली. या काळातही अनेक शेतांत वाफसा नसल्याने ऊस तोडणीदेखील रखडत सुरू होती. यानंतर २० ते २५ दिवस ऊस तोडणी गतीने सुरू होती.

त्यात डिसेंबरच्या अखेरीस खानदेशात अनेक भागात पाऊस आला. यात ऊस तोडणी रखडली. उसाची लागवड नंदुरबारमध्ये सर्वाधिक झाली आहे. तेथे सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. जळगाव जिल्ह्यातही सुमारे १२ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

धुळ्यातही शिरपूर, साक्री भागात ऊस पीक आहे. यंदा एकूण गाळप २७ ते २८ लाख टनांवर अपेक्षित आहे. साखर हंगाम वेळेत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु साखर हंगामास पावसाने उशीर होत आहे.

नोव्हेंबरमध्ये अनेक भागांत ऊस तोडणीवर आला. ऊस तोडणीबाबत अनेक कारखान्यांनी खानदेशात तयारी केली होती. दिवाळीलाच तोडणीचा मुहूर्त व बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमाचे नियोजनही करण्यात आले होते. परंतु पावसामुळे ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले.

ऊस तोडणी वेळेत न झाल्याने वजन व अन्य बाबींवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून ऊस पीक वाढविले आहे. परंतु तोडणी वेळेत झाल्यास उतारा चांगला मिळतो. तसेच क्षेत्रही लवकर रिकामे होते. त्यात पुढे खोडवा किंवा अन्य पीक कार्यवाही करावी लागते. परंतु ही कार्यवाही यंदा रखडत सुरू आहे.

खानदेशात मागील हंगामात ऊस तोडणी दिवाळीनंतर सुरू झाली होती. यंदाही ऊस तोडणी दिवाळीनंतर किंवा पुढील महिन्यात सुरू झाली. मागील आठवड्यातही अनेक भागात वाफसा नसल्याने ऊस तोडणी मजूर ऊस तोडणीसाठी तयार झाले नव्हते. यात तीन ते चार दिवसांपासून ऊस तोडणीला गती आली आहे.

खानदेशात सहा कारखाने सुरू

खानदेशात यंदा सहा साखर कारखाने सुरू आहेत. त्यात नंदुरबारमध्ये चार व जळगाव जिल्ह्यात दोन कारखाने सुरू आहेत. जळगावात चोपडा व मुक्ताईनगर येथे तर नंदुरबारमध्ये नवापूर, नंदुरबार, तळोदा व शहादा येथे साखर कारखाने सुरू आहेत. सर्वाधिक गाळप नंदुरबारमधील कारखान्यांनी केले आहे. यापाठोपाठ जळगावात गाळप सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा व मुक्ताईनगर येथील खासगी कारखान्यांनी गाळपासंबंधी कार्यवाहीस गती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT