Soybean Procurement Process Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : सोयाबीन उत्पादक अडचणीत

Team Agrowon

Satara News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ सुरू आहे. सोयबीन काढणीच्या काळात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसात सोयाबीन भिजू नये यासाठी काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. मात्र बाजार आधारभूत दराने खरेदी होत नसल्याने सोयाबीन ठेवावे की विकावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्र किंवा व्यापाऱ्यांना हमी भावाने खरेदी करण्याची सक्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दसरा, दिवाळी या मुख्य सणाच्या तोंडावर पैसे देणारे सोयाबीन पीक असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक लागवड झाली आहे. पाऊस, नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे पीक हाताशी लागेल की नाही, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, यंदा केंद्र सरकारने किमान हमीभाव चार हजार ८९२ रुपये जाहीर केला आहे. किमान हमीभावापेक्षा कोणीही कमी दराने सोयाबीन खरेदी करू नये, असा कायदा आहे.

या बाबत बाजार समित्यांही आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले, तर हमीभाव केंद्र सुरू नसल्याने त्यांना सोयाबीन घातला येत नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने मिळेल त्या दराने सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्यायच राहात नाही. सध्या बाजारपेठेत क्विंटलला चार ते चार हजार २०० रुपयांपर्यंत दर दिला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हा दर हमीभावाच्या तुलनेत ४०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या बाबत व्यापाऱ्यांशी संपर्क केला असता मिलला सोयाबीन क्विंटल ४५०० रुपये दर मिळत आहे. यातून खर्च वजा जाता चार ते चार हजार २०० रुपयांपर्यंत क्विंटल दर देणे शक्य असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांचा घातलेला खर्चही निघेना

सोयाबीन हे खरिपातील प्रमुख पीक असल्याने शेतकरी काहीही करून पेरणी करत असतो. उत्पादन वाढीसाठी महागडी खते टाकून, कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत. सोयाबीन काढायला १५० रुपये गुंठ्याने मजूर पैसे घेत आहेत. त्यातच मळणी करायला ४०० ते ४५० रुपये पोत्याला घेतले जात आहेत. घाम गाळून पिकवलेले सोयाबीन सरकारची खरेदी केंद्रे सुरू नसल्याने कमी दराने विक्री करावे लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाऊस जास्त झाल्याने मध्यम उतारा मिळेल. सध्या सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यातच सोयाबीन काढून बाजारात नेल्यावर तेथे व्यापाऱ्यांकडून चार हजार ते चार हजार २०० रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभाव तरी देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- अनंत माने, प्रगतिशील शेतकरी, रहिमतपूर, जि. सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT