Solapur News : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार? याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सरपंच आरक्षण सोडत नुकतीच झाल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली आहे. ही आरक्षण सोडत २०३० पर्यत वापरली जाणार आहे. या आरक्षण सोडतीमुळे गावातील राजकीय वातावरण ढवळण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. निवडणुकीला पात्र असलेल्या या ५१ ग्रामपंचायतींची प्रभाग रचनाही करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेली जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने या निवडणुकीची चुरस अधिक असणार आहे. या ५१ ग्रामपंचायतींमध्ये
बार्शी तालुक्यातील पाच, मंगळवेढा तालुक्यातील ७, पंढरपूर तालुक्यातील सात, सांगोला तालुक्यातील पाच, माळशिरस तालुक्यातील ११, अक्कलकोट तालुक्यातील चार, माढा तालुक्यातील दोन, मोहोळ तालुक्यातील चार, करमाळा तालुक्यातील तीन, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
माळशिरस तालुक्यातील पिलीव, मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर, सांगोला तालुक्यातील सोनंद, पंढरपूर तालुक्यातील चिंचणीचा समावेश आहे. चिंचणीसाठी नव्याने स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.