Nirmala Sitharaman Agrowon
ॲग्रो विशेष

India GDP : देशाचा जीडीपी ८ टक्क्यांनी वाढणार? केंद्रीय अर्थमंत्री यांचा दावा

Nirmala Sitharaman On India GDP : काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीला नकार देणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी देशाच्या जीडीपीवरून दावा केला आहे. सीतारमन यांनी, जीडीपीत ८ टक्क्यांनी वाढ होईल, असा दावा केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशात लोकसभा निवडणूका घोषित झाल्या असून अर्थ व्यवस्थेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीडीपीवर (देशाचा विकास दर) भाष्य केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून जीडीपी ८ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. सीतारामण यांनी शनिवारी (ता.३०) मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान हा दावा व्यक्त केला आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी, जीडीपीबाबत आपला अंदाज व्यक्त करताना, ३१ मार्चला संपलेल्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८ टक्के किंवा त्याहून अधिक राहील. तसेच जीडीपी वेगाने वाढत असून यात चौथ्या तिमाहीतही वाढ राहील, अशी आशा सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. तसेच फेब्रुवारीच्या अखेरीस सरकारने जारी केलेल्या आकडेवारीवरून देशाची अर्थव्यवस्था ८ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढली असल्याने दिसून येत असून ही बाब उल्लेखनीय असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.

मागील तिमाहीत जीडीपीची विचार केल्यास चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत जीडीपी वाढल्याचे दिसत आहे. मागील तिमाहीत जीडीपीतील वाढ ७.६ टक्के होती. पण आता यात वाढ झाली आहे. ती ८.४ टक्के झाल्याचे दिसत आहे. तर ही वाढ देशातील उत्पादन क्रियाकलाप आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळे झाल्याचेही सीतारामन यांनी म्हटले आहे.

यावेळी सीतारामन यांनी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्च अहवालाचा पुनरुच्चार केला. सीतारामन म्हणाल्या, देशाच्या जीडीपीतील वाढ ८ टक्के असून तो वाढू शकतो. तसेच मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती यासाठी अनुकूल आहे. तर मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रता पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या अहवाला प्रमाणे, देशाची अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ होत असून जगाची अर्थ व्यवस्था मंदावली आहे. यात जगातील काही सर्वात लवचिक अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. पण भारताचा जीडीपी २०२१ ते २०२४ दरम्यान सरासरी ८ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले आहे.

तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

जानेवारी-मार्च तिमाहीसाठी देशाच्या जीडीपीचे आकडे ३१ मार्च २०२४ ला जाहीर केले जाणार असून आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर निष्कर्ष ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील वार्षिक आकडेवारीवर काढला जातो. यंदाच्या निमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या तिमाहीत ७.६ टक्क्यांवर होती. तर ताज्या सरकारी अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत भारताची अर्थव्यवस्था याच गतीने वाढण्याची अपेक्षा आहे.

जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या मार्चचा अहवालात असेही म्हटले होते की चालू आर्थिक वर्षात भारत वार्षिक ८ टक्के विकास दर राखू शकतो. त्याचवेळी, नुकतेच रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांनी म्हटले आहे की भारत पुढील दशकात १० टक्के विकास दर गाठू शकतो. पात्रा म्हणाले, की भारत आपल्या ऊर्जा आणि बदलांच्या माध्यमातून आव्हानांवर मात करत आहे. अशा स्थितीत भारत २०३२ पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT